शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सततच्या नापिकीला कंटाळून उमरा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:03 IST

सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने  कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या उमरा येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१२ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

पाथरी (परभणी ) : मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने  कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या उमरा येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१२ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. कृष्णा कोल्हे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पाथरी पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालूक्यातील उमरा येथील शेतकरी कृष्णा शेषराव कोल्हे यांची उमरा शिवारात शेती असून त्यांनी शेतीवर बँकेकडून कर्ज घेतले होते. यातच मागील काही वर्षांपासून शेतात काहीच पिकत नाही. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडणार कुंटुबाचा उदनिर्वाह कसा चालवणार याच विवंचनेत ते कायम असायचे. दरम्यान गुरुवारी सकाळी कामानिमित्त म्हणून ते पाथरी येथे आले. येथे त्यांनी विषारी द्रव्याची बाटली विकत घेतली व सायंकाळी परत घरी परत आले. यानंतर रात्री त्यांनी सोबतचे विषारी द्रव्य प्राशन केले. यासोबतच त्यांनी कुटुंबियांना व जवळच्या नातलगांना फोनकरून याची कल्पना दिली. याबाबत ग्रामस्थानां माहिती मिळताच त्यांनी कोळे यांना रात्रीतून पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी व आई असा परिवार आहे. याप्रकरणी कोल्हे यांचे चुलत भाऊ विकास कोल्हे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेती