शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

परभणीत सेनेच्या मोर्चातून शेतकºयांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:30 IST

सिंचनासाठी मूबलक पाणी असताना वीज कंपनी अडवणूक करीत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकºयांसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सिंचनासाठी मूबलक पाणी असताना वीज कंपनी अडवणूक करीत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकºयांसह शिवसैनिक सहभागी झाले होते.शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १ वाजेच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. शेतकºयांच्या प्रश्नांबरोबरच जिल्ह्यातील अवैध धंदे, व्यापाºयांचा एलबीटी प्रश्न, महापालिकेने वाढविलेली घरपट्टी, जिल्ह्यातील ठप्प झालेली रोजगार हमी योजनेची कामे अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशाच्या गजरात हा मोर्चा निघाला. शनिवार बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भगवे रुमाल आणि भगवे झेंडे घेऊन शिवसैैनिक, शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, खा.बंडू जाधव, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, संतोष मुरकुटे, राम खराबे, माणिक पोंढे, प्रभाकर वाघीकर, जि.प. सदस्य विष्णू मांडे, बाळासाहेब जाधव, सूर्यकांत हाके, अतुल सरोदे, संजय सारणीकर, सखूबाई लटपटे, रामप्रसाद रणेर आदींची उपस्थिती होती. मोर्चा जिल्हा कचेरीसमोर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी शिवसेना पदाधिकाºयांनी आपल्या भाषणांमधून भाजप सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनावर तोफ डागली. यावेळी वडले, पाटील, डॉ. कच्छवे, आणेराव, डॉ.नावंदर, हाके यांची भाषणे झाली. प्रमुख मार्गदर्शन करताना खा.बंडू जाधव यांनी शेतकºयांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनाच्याविरुद्ध हा मोर्चा असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, महावितरण कंपनी वेळेवर वीज पुरवठा करीत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महावितरणच्या धोरणामुळे सुमारे १५ हजार शेतकरी कृषीपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित राहिले. राज्य शासनाने विशेष योजनांसाठी विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्याला पॅकेज दिले. मात्र परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले. जिल्ह्यात भाजपाचा आमदार, खासदार नसल्याने दुजाभाव केला जात आहे. हे पैसे मिळाले असते तर ३ हजार वीज जोडण्या सुरु झाल्या असत्या. याच सर्व मुद्यांवर ८ डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केले. लोकशाही मार्गाने चर्चा करीत असताना पोलीस प्रशासनाने मात्र आम्हाला गुन्हेगार ठरविले. आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाची भूमिका आडमुठी होती. पोलिसांनी हिंमत असेल तर मटकेवाले, दरोडेखोरांना पकडावे, असे आव्हानही त्यांनी पोलिसांना दिले. खा. जाधव यांनी आपल्या भाषणात पोलीस प्रशासन, मनपा आयुक्त, महावितरणचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांचा खरपूस समाचार घेतला. आम्हाला सन्मानाने वागणूक दिली तर त्यांचा सन्मान करु. मात्र जे आम्हाला खाजवितील त्यांना वाजविले जाईल, असा कडक इशाराही खा. जाधव यांनी दिला.पोलीस ठाण्यांचा लिलाव केलाखा.बंडू जाधव यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून हल्ला चढविला. मोर्चा अयशस्वी करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु, त्याला दाद न देता हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले. न्याय मागणाºया शेतकºयांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. जिल्ह्यात मटका, तितली भवरा असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परंतु, पोलीस प्रशासनातच दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा सर्रास लिलाव केल्याचा आरोप करीत हा सर्व प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून पोलीस प्रशासन आणि महावितरणची सध्याची स्थिती सांगितली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.वीज बिल घोटाळ्यात आयुक्तांवर गुन्हा दाखल करापरभणी महापालिकेच्या पैशांमधून खाजगी लोकांचे वीज बिल भरल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ७६ लाख रुपयांचा वीज बिल घोटाळा झाला असून या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खा.जाधव यांनी केली. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढविली आहे. एलबीटी प्रकरणातही आयुक्तांनी व्यापाºयांना वेठीस धरले. न्यायालय आणि जिल्हाधिकाºयांचे आदेश न मानता एलबीटीची वसुली केली. इतर महापालिकांच्या तुलनेत परभणीतील व्यापाºयांनी एलबीटीचे दुप्पट पैसे भरले असतानाही मनमानी कारभार करीत व्यापाºयांकडून वसुली सुरु केली आहे. या प्रकरणातही आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे खा.जाधव म्हणाले.