शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:04 IST

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.कापूस हे जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सर्वच शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र दोन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव उद्भवत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. २०१७ च्या हंगामात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला.१ ते २ वेचण्या झाल्यानंतर कापसाच्या झाडाला पाने, फुले लागत नव्हती. त्यामुळे सर्वच पीक बोंडअळीच्या प्रादूर्भावाने वाळून जात होते. २०१८ च्या हंगामातही हीच परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले, त्यापैकी बहुतांश शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला.बोंडअळीचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी कापसाचे पºहाटी उपटून काढणे हा शास्त्रोक्त पर्याय असून कृषी विभागाने यासाठी विशेष अभियान राबविले. गावा-गावात जावून कापूस पिकातील फरदड उपटून काढण्याची मोहीम राबविली.यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अपेक्षित होते. कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावात जाऊन शेतकºयांना या अभियानाचे महत्त्व पटवून दिले असते तर मोठ्या प्रमाणात गावे फरदडमुक्त झाली असती. मात्र हे अभियान कागदोपत्रीच राबविल्याने अनेक गावांमध्ये फरदडमुक्ती झाली नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादुर्भाव उद्भवण्याचा धोका कायम असल्याचे दिसत आहे.१५ हजार हेक्टरवरच नवीन पिकेकृषी विभागाने १४ नोव्हेंबर २०१८ पासून फरदडमुक्त गाव अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाचा लेखाजोखा देणारी माहिती कृषी विभागाने तयार केली आहे. जिल्ह्यामध्ये १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यातील १ लाख ७० हजार हेक्टर कोरडवाहू तर १९ हजार ८६९ हेक्टर बागायती पिकामध्ये मोडते. कापसाची लागवड १ लाख हेक्टरवर झाली असली तरी प्रत्यक्षात कापूस फरदड काढल्याने रिकाम्या झालेल्या केवळ १५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारीची लागवड करण्यात आली. तर परभणी तालुक्यातील सूरपिंपरी आणि सोन्ना ही दोनच गावे ७० ते ८० टक्के फरदडमुक्त केल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये राबविलेल्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.घडी पत्रिकांतून जनजागृतीबोंडअळीचा प्रश्न गंभीर असतानाही प्रत्यक्ष शेतावर जावून जनजागृती झाली नाही. शेतकºयांना फरदडमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी शेतकºयांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र केवळ घडी पत्रिकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुमारे ५ हजार घडीपत्रिका जिल्ह्यामध्ये वाटप केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात गावोगावी जावून फरदडमुक्ती केली असती तर बोंडअडळीचा धोका कमी झाला असता; परंतु, कागदोपत्री अभियान राबविल्याने पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस