शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:04 IST

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.कापूस हे जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सर्वच शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र दोन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव उद्भवत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. २०१७ च्या हंगामात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला.१ ते २ वेचण्या झाल्यानंतर कापसाच्या झाडाला पाने, फुले लागत नव्हती. त्यामुळे सर्वच पीक बोंडअळीच्या प्रादूर्भावाने वाळून जात होते. २०१८ च्या हंगामातही हीच परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले, त्यापैकी बहुतांश शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला.बोंडअळीचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी कापसाचे पºहाटी उपटून काढणे हा शास्त्रोक्त पर्याय असून कृषी विभागाने यासाठी विशेष अभियान राबविले. गावा-गावात जावून कापूस पिकातील फरदड उपटून काढण्याची मोहीम राबविली.यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अपेक्षित होते. कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावात जाऊन शेतकºयांना या अभियानाचे महत्त्व पटवून दिले असते तर मोठ्या प्रमाणात गावे फरदडमुक्त झाली असती. मात्र हे अभियान कागदोपत्रीच राबविल्याने अनेक गावांमध्ये फरदडमुक्ती झाली नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादुर्भाव उद्भवण्याचा धोका कायम असल्याचे दिसत आहे.१५ हजार हेक्टरवरच नवीन पिकेकृषी विभागाने १४ नोव्हेंबर २०१८ पासून फरदडमुक्त गाव अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाचा लेखाजोखा देणारी माहिती कृषी विभागाने तयार केली आहे. जिल्ह्यामध्ये १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यातील १ लाख ७० हजार हेक्टर कोरडवाहू तर १९ हजार ८६९ हेक्टर बागायती पिकामध्ये मोडते. कापसाची लागवड १ लाख हेक्टरवर झाली असली तरी प्रत्यक्षात कापूस फरदड काढल्याने रिकाम्या झालेल्या केवळ १५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारीची लागवड करण्यात आली. तर परभणी तालुक्यातील सूरपिंपरी आणि सोन्ना ही दोनच गावे ७० ते ८० टक्के फरदडमुक्त केल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये राबविलेल्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.घडी पत्रिकांतून जनजागृतीबोंडअळीचा प्रश्न गंभीर असतानाही प्रत्यक्ष शेतावर जावून जनजागृती झाली नाही. शेतकºयांना फरदडमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी शेतकºयांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र केवळ घडी पत्रिकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुमारे ५ हजार घडीपत्रिका जिल्ह्यामध्ये वाटप केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात गावोगावी जावून फरदडमुक्ती केली असती तर बोंडअडळीचा धोका कमी झाला असता; परंतु, कागदोपत्री अभियान राबविल्याने पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस