शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सोयाबीन विकून महिना झाला तरी मानवतच्या शेतक-यांना पैसे मिळेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 16:29 IST

केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. यामुळे खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

ठळक मुद्दे 720 की सोयाबीन खरेदी चे 22 लाख रुपये रखडलेआठवड्याच्या आत रक्कम जमा करण्याची घोषणा हवेत विरली

 

- विठ्ठल भिसे

पाथरी : केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. यामुळे खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

राज्य शासनाने या वर्षी केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने एफएकयु प्रतीचे सोयाबीन ,मूग ,उडीद खरेदी करण्यासाठी हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले. सोयाबीन साठी 3 हजार 50 रुपये तर मूग साठी 5 हजार 575 रुपये हमी दर जाहीर केला, खरेदी केंद्रावर शेतमाल आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ स्तरावर ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली. त्यानंतर मोबाईल एसएमएस वरून  शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ नाफेडमार्फत पाथरी आणि मानवत तालुक्यासाठी मानवत येथे किमान आधारभूत दराने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, मानवत मार्केट यार्डात 13 नोव्हेंबर रोजी खरेदी विक्री संघाच्या वतीने खरेदी सुरू झाली. मात्र, खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी मात्र 2200 ते 2400 रुपये की सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली, अगोदरच सोयाबीन ला उतारा कमी त्यात भाव नसल्याने शेतकरी यात भरडला गेला.

694 शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीमानवत येथील किमान आधारभूत दाराच्या खरेदी केंद्रावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील 693 शेतकऱ्यांनि आपला शेतमाल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे यात 497 शेतकरी सोयाबीन , तर 197 शेतकरी मूग विक्री साठी नोंदणी झाली आहे. 

महिना झाला तरी पैसे जमा नाहीत खरेदी केंद्र सुरू होऊन एक महिना लोटला आहे.या दरम्यान 720 किलो सोयाबीन आणि 142 की मूग अशी  30 लाख रुपयाची खरेदी येथे झाली.मात्र, आठवड्यात पैसे खात्यात जमा होणार असे जाहीर केले असताना आज महिना झाला तरी एक रुपयाही शेतक-यांच्या खात्यात जमा झाला नाही. 

12 लाख निधी उपलब्धमानवत खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या शेतमालाची 12 लाख 85 हजार 900 रुपये रक्कम 12 डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे. रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.- माणिक भिसे, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ मानवत

आधीच अडचण त्यात आणखी फसगतसोयाबीनला उतारा नव्हता आता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच  सोयाबीन विक्री करून २० दिवस झाले तरी याची रक्कम अजूनही मिळाली नाही. यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे- उद्धव भिसे, शेतकरी, कोल्हावाडी 

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाparabhaniपरभणी