शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

कोरोनाच्या ११ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे. आतापर्यंतच्या संसर्ग काळातील मृत्यूचे हे ...

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे. आतापर्यंतच्या संसर्ग काळातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक ठरले आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात दररोज २०० ते ३०० रुग्णांची नोंद होत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवडाभरापासून दररोज रुग्ण दगावत आहेत. गुरुवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५ पुरुष, ५ महिला आणि खासगी रुग्णालयातील एक पुरुष अशा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ४२३ झाली आहे.

आरोग्य विभागाला गुरुवारी २ हजार ३५६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ७९८ अहवालांमध्ये २२१ आणि रॅपिड टेस्टच्या ५५८ अहवालांमधून १७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूण ४०० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता एकूण १४ हजार ८५७ रुग्ण संख्या झाली आहे. त्यातील ११ हजार ८९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २ हजार ५३५ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १२९ रुग्ण उपचार घेत असून, खासगी रुग्णालयात २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ हजार १०९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.