शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

परभणी जिल्ह्यात १३२ केव्ही केंद्रांअभावी वाढली विजेची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:02 IST

जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भागात उपकेंद्रांना वीज पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी तीन १३२ केव्ही वीज केंद्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भागात उपकेंद्रांना वीज पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी तीन १३२ केव्ही वीज केंद्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे़परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो़ उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वाहिन्यांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ केव्ही केंद्रांमधून केल जाते़ परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीला असे सहा केंद्र उपलब्ध आहेत़ परभणी, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, पाथरी आणि गंगाखेड येथून या केंद्रांच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था राबविली जाते़; परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ सद्यस्थितीला कृषी, घरगुती, औद्यागिक आणि वाणिज्य अशा चार गटांमध्ये २ लाख ८० हजार वीज ग्राहक विजेचा वापर करतात़ या ग्राहकांना वीज पुरवठा करताना महावितरणला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे़ केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकाच्या घरी वीज जोडणी देण्याच्या योजना आखल्या जात आहेत़ सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांसाठी महावितरणने वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे़ एकीकडे खेडोपाडी वीज पुरविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे साधन सामग्री वाढविण्यासाठी मात्र प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत़परभणी जिल्ह्यामध्ये सहा १३२ केव्ही केंद्र आणि ३३ केव्हीची ७८ उपकेंद्रे आहेत़ या केंद्रांमधून ग्राहकांपर्यंत वीज पोहचविली जाते़ परंतु, जिल्ह्यातील विजेची मागणी लक्षात घेता १३२ केव्ही वीज केंद्रांची संख्या अपुरी पडत असून, या केंद्रांमधून वीज वितरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ विजेचा दाब कमी-अधिक होतो़ परिणामी वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत जाते़ ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने ओरड वाढत चालली आहे़ मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विजेच्या संदर्भाने ग्राहकांच्या तक्रारी असतानाही प्रशासनाकडून मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत़ परिणामी जिल्ह्यामध्ये ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे़मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताणमागील काही वर्षांच्या तुलनेत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ वीज ग्राहकांची संख्या तर वाढली आहेच़ या शिवाय ग्राहकांकडून विजेचा वापरही दुपटीने वाढला आहे़ अनेक कामे विजेशिवाय होत नसल्याने दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे़ ग्राहकांची ही मागणी पुरविणारी यंत्रणा मात्र जुनीच आहे़ या यंत्रणेत सुविधा करणे आवश्यक असताना वेळोवेळी ही सुधारणा झाली नाही़ मागणीच्या तुलनेत यंत्रणा वाढविणे आवश्यक होते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरणावर ताण येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन