शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणी जिल्ह्यात १३२ केव्ही केंद्रांअभावी वाढली विजेची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:02 IST

जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भागात उपकेंद्रांना वीज पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी तीन १३२ केव्ही वीज केंद्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भागात उपकेंद्रांना वीज पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी तीन १३२ केव्ही वीज केंद्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे़परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो़ उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वाहिन्यांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ केव्ही केंद्रांमधून केल जाते़ परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीला असे सहा केंद्र उपलब्ध आहेत़ परभणी, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, पाथरी आणि गंगाखेड येथून या केंद्रांच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था राबविली जाते़; परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ सद्यस्थितीला कृषी, घरगुती, औद्यागिक आणि वाणिज्य अशा चार गटांमध्ये २ लाख ८० हजार वीज ग्राहक विजेचा वापर करतात़ या ग्राहकांना वीज पुरवठा करताना महावितरणला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे़ केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकाच्या घरी वीज जोडणी देण्याच्या योजना आखल्या जात आहेत़ सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांसाठी महावितरणने वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे़ एकीकडे खेडोपाडी वीज पुरविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे साधन सामग्री वाढविण्यासाठी मात्र प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत़परभणी जिल्ह्यामध्ये सहा १३२ केव्ही केंद्र आणि ३३ केव्हीची ७८ उपकेंद्रे आहेत़ या केंद्रांमधून ग्राहकांपर्यंत वीज पोहचविली जाते़ परंतु, जिल्ह्यातील विजेची मागणी लक्षात घेता १३२ केव्ही वीज केंद्रांची संख्या अपुरी पडत असून, या केंद्रांमधून वीज वितरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ विजेचा दाब कमी-अधिक होतो़ परिणामी वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत जाते़ ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने ओरड वाढत चालली आहे़ मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विजेच्या संदर्भाने ग्राहकांच्या तक्रारी असतानाही प्रशासनाकडून मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत़ परिणामी जिल्ह्यामध्ये ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे़मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताणमागील काही वर्षांच्या तुलनेत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ वीज ग्राहकांची संख्या तर वाढली आहेच़ या शिवाय ग्राहकांकडून विजेचा वापरही दुपटीने वाढला आहे़ अनेक कामे विजेशिवाय होत नसल्याने दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे़ ग्राहकांची ही मागणी पुरविणारी यंत्रणा मात्र जुनीच आहे़ या यंत्रणेत सुविधा करणे आवश्यक असताना वेळोवेळी ही सुधारणा झाली नाही़ मागणीच्या तुलनेत यंत्रणा वाढविणे आवश्यक होते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरणावर ताण येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन