शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:15 AM

देशात २२ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. आता अनलॉक प्रक्रियेनंतर ...

देशात २२ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. आता अनलॉक प्रक्रियेनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत; परंतु अन्य वर्ग सुरू नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयांची तर अधिक दयनीय अवस्था आहे. जिल्ह्यात परभणी येथे श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. हे महाविद्यालयही कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहे. या महाविद्यालयात सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांचे विविध शाखांचे ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. आर्थिक चणचण असतानाही प्राचार्य व प्राध्यापक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य या माध्यमातून करीत असल्याचे दिसून येत आहे.

शिष्यवृत्ती थकली, शैक्षणिक शुल्कही प्रलंबित

अभियांत्रिकी महाविद्यालयांंत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची जवळपास २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती शासनाकडे थकली आहे. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग होत असले तरी अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे त्यांचे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या आर्थिक अडचणीत वाढ झालेली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश सहा महिन्यांनी लांबले. त्यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून येणारे शुल्कही विलंबाने मिळत आहेत. परिणामी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींचा पगार कसा करावा, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. गेल्या तीन महिन्यांपर्यंत संबंधितांना नियमित पगार देण्यात आला. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक चणचणीतून प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा पगार थकला आहे.

शासनाकडून एकीकडे मेक इन इंडियाची उद्‌घोषणा केली जात आहे. तर, दुसरीकडे अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाने या महाविद्यालयांकडे लक्ष देऊन त्यांची आर्थिक अडचणीतून सोडवणूक करणे आवश्यक आहे. संशोधनासाठी अधिक प्रमाणात निधी लागतो. त्यामुळे नॅक, एनबीए आदींचा विचार न करता संशोधनासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना निधी दिला पाहिजे.

- डॉ. आनंद पाथरीकर, प्राचार्य,

श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय