शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

पाण्याअभावी झाडे वाळू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

कार्यालयात वाढली अस्वच्छता परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही ...

कार्यालयात वाढली अस्वच्छता

परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही परिस्थिती दिसून येते. या भागात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र, इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. फरशा उखडल्या असून, भिंतींचे कोपरे पान खाऊन थुंकल्याने रंगले आहेत.

बाजारपेठ भागातील रस्त्यावर खड्डे

परभणी : शहरातील मोंढा बाजारपेठ भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. मागच्या काही दिवसांपासून या भागात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

प्लास्टिक संकलन मोहीम

परभणी : जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टिकमुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टिक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो.

अस्वच्छता वाढली

परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. नालीचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. त्यामुळे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

जड वाहनांचा शिरकाव

परभणी : शहरात सर्रास जड वाहनांचा शिरकाव होत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. नियम डावलत ही वाहने शहरातून धावतात. त्यामुळे वाहतूक खोळंबा होत आहे. बाजारपेठ भागात ही समस्या अधिक आहे.

वाहतुकीचा खोळंबा

परभणी : येथील विसावा कॉर्नर भागात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या स्टेशन रोडवरील वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक सुरू केल्यास ही समस्या निकाली निघू शकते.

मास्कची विक्री वाढली

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तीन दिवसांपासून कारवाया सुरू केल्याने शहरी भागात मास्कची विक्री वाढली आहे. बाजारपेठ भागातील रस्त्याकडेला अनेक ठिकाणी मास्क विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत.

उसाचे क्षेत्र वाढले

परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्णा, गंगाखेड, पालम, पाथरी या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. गोदावरी पात्रातील बंधारे, जायकवाडी, दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे कल वाढविला आहे.