शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

अभियंत्याअभावी जलजीवन मिशनची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:16 AM

जिंतूर : जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तिला ५५ लीटर पिण्याचे पाणी देण्याची योजना आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाला ...

जिंतूर : जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तिला ५५ लीटर पिण्याचे पाणी देण्याची योजना आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाला उपविभागीय अभियंता नसल्याने ही योजना रखडली असून, अनेक गावातील जलजीवन मिशनचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत.

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित केली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहुतांश योजना कालबाह्य झाल्या आहेत. ज्या गावांमध्ये योजना कालबाह्य झाल्या. त्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून नवीन योजना घेऊन प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर पिण्यायोग्य पाणी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत या योजनेअंतर्गतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करायचे आहेत. या योजनेअंतर्गत तालुक्यातील १७० गावांपैकी जवळपास १३५ ते १४० गावांमध्ये या योजनेचे प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. भारत निर्माण योजना, स्वजलधारा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जीवन प्राधिकरण योजना याअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या योजना एक तर अपूर्ण आहेत किंवा त्या कालबाह्य झाल्या आहेत. याशिवाय ग्रामपातळीवर असणाऱ्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे १० वर्षांपूर्वीच्या योजनेतून प्रतिव्यक्ती ३० ते ३५ लीटर पाणी दिले जात होते. परंतु, आता प्रतिमाणसी ५५ लीटर पाणी देण्यात यावे, यासाठी जलजीवन योजना आणली. या योजनेअंतर्गत गावागावात करावयाच्या कामांची अंदाजपत्रके जिंतूर उपविभागातील उपविभागीय अभियंता व संबंधित अभियंत्यांना करावयाची आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून या विभागाला पूर्णवेळ अभियंता नाही. एस. व्ही. देशमुख या अभियंत्यांकडे उपविभागीय अभियंत्याचा पदभार आहे. ते वैद्यकीय रजा टाकून २२ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर निघून गेले आहेत. बालाजी पाटील यांची जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता म्हणून नियुक्ती, तर शेषराव घुगे यांची जिंतूर पंचायत समितीला अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील हे दोन अभियंते निघून गेले. तसेच देशमुख यांचीही बदली पाथरी येथे झाली आहे. परंतु, त्यांच्या बदलीच्या आदेशात पर्यायी व्यक्ती आल्यानंतरच पदभार सोडावा, असे स्पष्ट असताना देशमुख मात्र वैद्यकीय रजेवर गेले ते आलेच नाहीत. परिणामी मनरेगाच्या कामांना तांत्रिक मान्यता तसेच पंधराव्या व सोळाव्या वित्त आयोगातील पाणीपुरवठ्याच्या कामांना मंजुरी आदी कामे खोळंबली आहेत. सध्या पाणी पुरवठा विभागाला आष्टीकर हे केवळ कंत्राटी अभियंते आहेत. त्यांच्याकडे १७० गावाचा कारभार आहे.

या गावातील अंदाजपत्रके रखडली

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील तेलवाडी, चितनरवाडी, धोपटवाडी, देवसडी, गारखेडा, शेख, मालेगाव दुधना, नांदगाव दुधना, भोशी, सावरगाव तांडा, भिलज आदी गावातील प्रस्ताव तातडीने सादर करणेबाबत आदेशित केल्यानंतरही या गावातील प्रस्ताव रखडलेल्या अवस्थेत आहेत. उपविभागीय अभियंता नसल्याने पाणीपुरवठा विभागाची कामे रेंगाळली आहेत.