शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

पालम तालुक्यात पुरामुळे दोन हजार हेक्टर पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 5:37 PM

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

ठळक मुद्देलेंडी व गळाटी नदीला मागील दोन दिवसांपासून पूर

पालम : तालुक्यातील लेंडी व गळाटी नदीला मागील दोन दिवसांपासून पूर आलेला आहे. दोन्ही नद्या दुधडी भरून वाहत असल्याने नदीकाठचे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

मागील चार दिवसांपासून पालम तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नदी नाले खळखळून वाहता आहेत. 31 ऑगस्टपासून पाऊस सुरू झाल्याने एक व दोन सप्टेंबर रोजी पालम तालुक्यातील नद्यांना  पूर आला आहे. नदीचे पात्र लहान असल्याने पुराचे पाणी पात्राबाहेर निघून आजूबाजूच्या शेतशिवारात शिरले आहे. त्यामुळे खरिप हंगामामधील सोयाबीन,कापूस, मूग, संकरित ज्वारी, तूर आदी पिके 2 दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. तसेच पुराच्या प्रवाहामुळे नदीकाठावरील शेतजमिनीची मोती मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. यात जवळपास दोन हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

या गावातील शेतीचे झाले नुकसान गळाटी नदीमुळे नावा,नावलगाव, कांदलगाव,केरवाडी, सायळा, शिरपूर, कापशी,आरखेड, सोमेश्वर घोडा, लेंडी नदीच्या पुरामुळे आडगाव, वनभुजवाडी, पुयणी, पालम, गुळखंड, जवळा व फळा आणि  सेलु पेंडू नदीमुळे वानवाडी, सर्फराजपुर, कोळवाडी, पालम शिवार या गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :floodपूरparabhaniपरभणीagricultureशेती