शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

दुष्काळामुळे रेशीम शेती अडचणीत; शेतकऱ्याने तुतीच्या बागेवर फिरवला नांगर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:46 IST

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने शेतकरी हतबल झाला आहे

ठळक मुद्देपाणी नसल्याने बागायती शेती मोडकळीस निघाली आहे तुतीच्या बागा मोडाव्या लागल्याने रेशीम शेती अडचणीत

- विठ्ठल भिसे 

पाथरी (परभणी ) :  दुष्काळी परिस्थिती मुळे बागायती शेती पूर्णतः हातची गेली आहे, केळीच्या बागा जळून जात आहेत, उसाचे फड करपून जाऊ लागले आहेत, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. आता तर कासापुरी येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी वाळून जात असलेल्या तुतीच्या बागेवर नांगर फिरवला आहे. तालुक्यातील संपूर्ण  रेशीम शेतीच अडचणीत आली आहे. शासनाच्या मनरेगा योजनेचा लाभ मिळवण्यास होणाऱ्या अडचणी या मुळे ही रेशीम उधोग बाळसे धरण्यापूर्वीच मोडीस निघत आहे.

पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पिके हातची गेली आहेत. गावोगावी ऊस,केळी, पपईच्या बागा करपल्या आहेत. दरवर्षी दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत आहे.  पारंपरिक शेती परवडत नसल्याने शासनाच्या म नरेगा योजनेत रेशीम शेतीच्या तुती लागवडीसाठी शासनाने समावेश केला खरा मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होताना दिसत नाही. बोरगव्हान या एकमेव गावात मनरेगा अंतर्गत तुती लागवड आहे इतर गावात काही शेतकरी स्वखर्चाने तुती लागवड करून रेशीम शेती करू लागले आहेत. मात्र, या वर्षी दुष्काळाने पाण्या अभावी तुतीच्या बागा ही जळून जाऊ लागल्या आहेत.कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांच्या गट न. 175 मध्ये असलेल्या 2 एकर तुतीच्या शेतीला पाणी कमी पडत असल्याने बाग जळू लागली आहे. पाण्या अभावी त्यांना अर्धा एकर तुतीच्या बागेवर नांगर फिरवावा लागला आहे. 

प्रशासकीय उदासिनताशासनाने मनरेगा योजने अंतर्गत तुती लागवडी साठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान जाहीर केले मात्र तहसील कार्यालयातील यंत्रणा यासाठी आडकाठी बनत असल्याने शेतकरी योजनेपासून दूर जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळWaterपाणी