शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुष्काळामुळे रेशीम शेती अडचणीत; शेतकऱ्याने तुतीच्या बागेवर फिरवला नांगर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:46 IST

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने शेतकरी हतबल झाला आहे

ठळक मुद्देपाणी नसल्याने बागायती शेती मोडकळीस निघाली आहे तुतीच्या बागा मोडाव्या लागल्याने रेशीम शेती अडचणीत

- विठ्ठल भिसे 

पाथरी (परभणी ) :  दुष्काळी परिस्थिती मुळे बागायती शेती पूर्णतः हातची गेली आहे, केळीच्या बागा जळून जात आहेत, उसाचे फड करपून जाऊ लागले आहेत, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. आता तर कासापुरी येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी वाळून जात असलेल्या तुतीच्या बागेवर नांगर फिरवला आहे. तालुक्यातील संपूर्ण  रेशीम शेतीच अडचणीत आली आहे. शासनाच्या मनरेगा योजनेचा लाभ मिळवण्यास होणाऱ्या अडचणी या मुळे ही रेशीम उधोग बाळसे धरण्यापूर्वीच मोडीस निघत आहे.

पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पिके हातची गेली आहेत. गावोगावी ऊस,केळी, पपईच्या बागा करपल्या आहेत. दरवर्षी दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत आहे.  पारंपरिक शेती परवडत नसल्याने शासनाच्या म नरेगा योजनेत रेशीम शेतीच्या तुती लागवडीसाठी शासनाने समावेश केला खरा मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होताना दिसत नाही. बोरगव्हान या एकमेव गावात मनरेगा अंतर्गत तुती लागवड आहे इतर गावात काही शेतकरी स्वखर्चाने तुती लागवड करून रेशीम शेती करू लागले आहेत. मात्र, या वर्षी दुष्काळाने पाण्या अभावी तुतीच्या बागा ही जळून जाऊ लागल्या आहेत.कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांच्या गट न. 175 मध्ये असलेल्या 2 एकर तुतीच्या शेतीला पाणी कमी पडत असल्याने बाग जळू लागली आहे. पाण्या अभावी त्यांना अर्धा एकर तुतीच्या बागेवर नांगर फिरवावा लागला आहे. 

प्रशासकीय उदासिनताशासनाने मनरेगा योजने अंतर्गत तुती लागवडी साठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान जाहीर केले मात्र तहसील कार्यालयातील यंत्रणा यासाठी आडकाठी बनत असल्याने शेतकरी योजनेपासून दूर जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळWaterपाणी