शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

परभणीत कापसाला दुष्काळी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:40 IST

जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन ही दोन नगदी पिके म्हणून ओळखली जातात़ शेतकरी कापसाच्या लागवडीवर भर देतो़ इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादनातून लवकर पैसा मोकळा होत असल्याने पांढरं सोनं म्हणून या कापसाकडे पाहिले जाते़ मात्र यावर्षी कापसानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे़ मागील वर्षी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीने बाधित झाला होता़परिणामी उत्पन्नात घट झाली़ यावर्षी देखील शेतकºयांनी धोका पत्कारून कापसाची लागवड केली़ काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत असला तरी सर्वाधिक फटका बसला तो परतीच्या पावसाचा. पाऊस वेळेवर न झाल्याने कापसाची वाढ खुंटली़ सर्वसाधारणपणे एक ते दोन वेचण्यातूनच शेतकºयांना कापसाचे उत्पादन मिळाले आहे़नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे; परंतु, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक घटल्याने व्यापारी चिंतेत आहेत़ परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत १३१ गावांमधील कृषी मालाची खरेदी-विक्री होते़ कापूस खरेदीतून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते़ मात्र यावर्षी बाजार समिती अंतर्गत आवक घटली आहे़२०१६-१७ मध्ये परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ६६ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती़ तर मागीलवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव असतानाही ५८ हजार क्विंटल कापूस बाजार समितीत डिसेंबर महिन्यापर्यंत दाखल झाला होता़ यावर्षी मात्र डिसेंबर अखेर केवळ ४० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे़ सर्वसाधारपणे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव कापसाला मिळत असतानाही आवक मात्र घटली आहे़ मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० हजार क्विंटल कापूस कमी विक्रीसाठी आला़ त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला असून, जिनिंग, प्रेसिंग व्यवसायिकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत़ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये एकीकडे कृषी बाजारपेठ ठप्प असताना दुसरीकडे जिनिंग व्यावसायिकांनाही फटका सहन करावा लागत आहे़ई-नामचा कापूस विक्रीवर अडथळापरभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत बाजार समितीत येणाºया प्रत्येक मालाची खरेदी-विक्री आॅनलाईन पद्धतीने केली जाते़ खरेदी केलेल्या मालाचे पेमेंटही थेट शेतकºयाच्या खात्यावर जमा होते़ यासाठी सर्वसाधारणपणे आठ दिवसांचा काळ लागतो़ शेतीमालाची विक्री झाल्यानंतर थेट हातामध्ये रोख पैसे मिळावेत, अशी शेतकºयांची भावना असते़ परंतु, परभणी बाजार समितीत शेत माल विक्री केल्यानंतर त्याचे पेमेंट आठ दिवसांनी होत असल्याने शेतकरी ई-नाम प्रणालीतून माल विक्री करण्याऐवजी खाजगी व्यापाºयांना किंवा ज्या बाजार समितीत ई-नाम प्र्रणाली नाही, तेथे शेतमाल विक्री करीत आहेत़ परभणी बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक कापूस उत्पादकांनी मानवत येथील बाजार समितीत कापसाची विक्री केली़ त्याचाही फटका परभणी बाजार समितीला बसला आहे़भाव कमी मिळत असल्याचा परिणामदुष्काळी परिस्थितीबरोबरच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांनी या बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे़ मानवतसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कापसाला किमान १०० रुपये जास्तीचा भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांनी ज्या ठिकाणी अधिक भाव आहे तेथे कापूस विक्री करणे पसंत केले़ परिणामी बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ