शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील मोंढ्याला दुष्काळाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:49 IST

सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यातील परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या मोंढा बाजारपेठेला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ सहा महिन्यात निम्मी उलाढाल ठप्प झाल्याने या मोंढ्यावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुरांसह हजारो व्यावसायिकांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यातील परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या मोंढा बाजारपेठेला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ सहा महिन्यात निम्मी उलाढाल ठप्प झाल्याने या मोंढ्यावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुरांसह हजारो व्यावसायिकांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत़मागील वर्षीच्या सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात येणारा मान्सूनचा परतीचा पाऊस गायब झाला आणि जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र झाली़ जिल्ह्यात रबी हंगामावर अक्षरश: पाणी सोडावे लागले़ येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्या तरी दुसºया बाजुला याच शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या मोंढा बाजारपेठेतही दुष्काळचा तीव्र परिणाम झाला आहे़परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यातील १३१ गावांतील शेतकºयांचा शेतीमाल खरेदी केला जातो़ या शिवाय या शेतकºयांना लागणारे बियाणे, खते, औषधी आणि शेती साहित्याची विक्री याच ठिकाणी होते़ येथील व्यावसायिकांनी मागील वर्षी रबी हंगामाची पूर्व तयारी केली़ पावसाची प्र्रतीक्षा करता करता हिवाळा तोंडावर आला तरी पाऊस झाला नाही़ परिणामी रबी हंगामासाठी खरेदी केलेला लाखो रुपयांचा माल मोंढ्यात पडून आहे़ तर दुसरीकडे खरेदी-विक्र व्यवहार ठप्प झाल्याने हातावर पोट असलेले मजूरही उपासमारीचा सामना करीत आहेत़ सहा महिन्यांपासून दुष्काळाशी झगडत असलेल्या या मजुरांची परिस्थिती अधिकच विदारक असून, काही मजुरांनी मोंढा सोडून इतर ठिकाणी रोजगार शोधला आहे़कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस, गहू, सोयाबीन या शेतमालाची खरेदी केली जाते़ बाजार समितीतील व्यापाºयांकडून लिलाव पद्धतीेने केलेल्या खरेदीवर बाजार समितीला उत्पन्न मिळते़ मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीला १३० कोटी २७ लाख ४६ हजार ४०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले़ यावर्षीच्या मार्चअखेर बाजार समितीचे उत्पन्न १५४ कोटी ७७ लाख ७२ हजार ९२९ रुपयांवर पोहचले आहे़ बाजार समितीला मागील वर्षीच्या तुलनेत २४ कोटी ५० लाख २६ हजार ५२८ रुपयांचे अधिक उत्पन्न झाले आहे़ मात्र वाढती महागाई, शेतमालांचे वाढलेले दर याची तुलना करता मागील वर्षीच्या तुलनेत या बाजार समितीला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे़मागील वर्षीच्या तुलनेत २ हजार रुपये अधिक दराने कापसाची खरेदी झाली़ १ हजार ८०० रुपये दराने सोयाबीनची खरेदी झाली आह़े त्याच प्रमाणे गव्हाची खरेदी गतवर्षीच्या तुलनेत अधिक दराने झाली आहे़ असे असतानाही उत्पन्नाचे आकडे मात्र मर्यादित असल्याने बाजार समितीला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यावसायिकांसह मजूर, बाजार समितीतील कर्मचारी, आडते अशा हजारो कुटूंबियांची गुजरान होते़ यावर्षी संपूर्ण हंगामात बाजार समितीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे हजारो कुटूंबियांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ सध्या बाजारपेठेत कृषी निविष्ठांचा साठा केला जात आहे. आगामी जून, जुलै महिन्यात नवीन हंगामाला सुरुवात होत असून, जुने विसरून बाजार समितीतील व्यापारी नव्याने तयारीला लागले आहेत़मजुरांची आर्थिक ओढाताण४येथील बाजार समितींतर्गत कापूस जिनिंग, एमआयडीसी, मोंढा बाजारपेठ, मार्केट यार्ड आणि वेअर हाऊसमध्ये साधारणत: ६०० मजूर काम करतात़ दररोज मोंढा बाजारपेठेत येऊनही मजूर मंडळी दिवसभर दुकानांसमोर थांबलेली असतात़४सर्वसाधारणपणे दररोज ४०० ते ५०० रुपये उत्पन्न मिळविणाºया या मजुरांना यावर्षी मात्र दिवसाकाठी १०० रुपये मिळणेही मुश्कील झाले आहे़४बाजारपेठेतील खरेदी-विक्री ठप्प असल्याने दिवसभर हातावर हात ठेवून गप्प राहणे आणि सायंकाळी रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ मजुरांवर आली आहे़ त्यामुळे येथील अनेक मजुरांनी पर्यायी रोजंदारीचा व्यवसाय निवडला आहे़शेतमालांची घटली आवकच्येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे़ रबी हंगामात उत्पन्न मिळाले नसल्याने त्याचा फटका बाजार समितीला सहन करावा लागत आहे़ तसेच ईनाम आणि लिलावात कापसाला कमी भाव मिळाल्याने त्याचाही उत्पन्नावर परिणाम झाला.च्२०१७-१८ च्या हंगामात २ लाख २६ हजार ६०४ क्विंटल कापसाची आवक झाली होती़ त्या तुलनेत यावर्षी १ लाख ६६ हजार २५५ क्विंटल कापसाची आवक झाली आहे़ ६० हजार ३४९ क्विंटल आवक कमी झाली़ तर मागील वर्षी ५३ हजार ९१९ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती़ परिणामी आवकीत मोठी घट झाली आहे.च्यावर्षी केवळ ४३ हजार ९६२ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत खरेदी झाले आहे़ गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन खरेदीतून बाजार समितीला सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी सोयाबीनचे भाव ३५० रुपयांनी वाढले होते़ परंतु, तरीही बाजार समितीला गतवर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाले आहे़मोंढा बाजारपेठेत दररोज सकाळी १० वाजताच दाखल होतो़ घरून येताना दुपारचे जेवणही सोबत घेतले जाते़ दिवसभरामध्ये हाताला काम मिळाले तर दुसºया दिवशीच्या पोटापाण्याची सोय होते़ परंतु, सहा महिन्यांपासून १०० रुपयांचे कामही लागत नसल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ दिवसभर मोंढ्यात थांबून सायंकाळी घरी जाताना उद्याचा दिवस कसा घालवायचा? याची चिंता लागलेली असते़-अब्दुल मन्नान खान, मजूर१५ वर्षांपासून मोंढ्यात मजुरीचे काम करीत आहे़ आतापर्यंत घर चालविण्यापुरते पैसे या ठिकाणी मिळत होते़ मात्र सहा महिन्यांपासून हाताला काम नाही़ त्यामुळे दिवसभर मोंढा बाजारपेठेत बसून रहावे लागते़ खरेदी आणि विक्री होत नसल्याने आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ घर कसे धकवावे, ही चिंता सतावत आहे़-रफिक खान, मजूर

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती