शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

हिस्सी येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:16 IST

दोन दिवसांपासून हिस्सी अंधारात हिस्सी : सेलू तालुक्यातील हिस्सी गावचा वीजपुरवठा थकीत देयकासाठी महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे ...

दोन दिवसांपासून हिस्सी अंधारात

हिस्सी : सेलू तालुक्यातील हिस्सी गावचा वीजपुरवठा थकीत देयकासाठी महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून अंधारात आहे.

वीज वितरण कंपनीच्या वतीने मागील महिनाभरापासून वीज देयकाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्याच अनुषंगाने हिस्सी येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या देयकाचा भरणा वेळेत केला नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने हिस्सी येथील वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. जोपर्यंत थकीत बिलाची वसुली होणार नाही. तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जनार्दन सोनटक्के यांनी सांगितले.

अपघाताच्या घटना वाढल्या

चारठाणा : जिंतूर-जालना या महामार्गावर मागील महिनाभरापासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रात्री-अपरात्री या रस्त्यावरून वाहनधारक भरधाव वेगाने आपली वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. शुक्रवारी एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे याकडे महामार्ग पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वीज वितरण कंपनीविरुद्ध तीव्र संताप

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मीटर रीडिंग घेण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने दहाहून अधिक एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या एजन्सी प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन रीडिंग घेत नाहीत. मात्र, प्रत्येक महिन्याला अंदाजे बिले पाठविली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वापरापेक्षा अधिकची बिले येत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

संदलापूर-कात्नेश्वर रस्त्याची दुरवस्था

पूर्णा : तालुक्यातील संदलापूर ते कात्नेश्वर या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पूर्णा शहर गाठण्यासाठी हा रस्ता जवळचा म्हणून वाहनधारक पसंती देत आहेत. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने बांधकाम विभागाविरुद्ध वाहनधारक संताप व्यक्त करीत आहेत.

बांधकामधारक हैराण

देवगावफाटा : एकीकडे वाळू मिळत नसल्याने बांधकामधारक चिंताग्रस्त असताना दुसरीकडे विटांचे भावही ५ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईने बांधकाम करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. बांधकामधारकांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने वाळू सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.