शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
2
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
3
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
4
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
5
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
6
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
7
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
8
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
9
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
10
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
11
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
12
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
13
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
14
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
15
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
16
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
17
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
18
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
19
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
20
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत

हिस्सी येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:16 IST

दोन दिवसांपासून हिस्सी अंधारात हिस्सी : सेलू तालुक्यातील हिस्सी गावचा वीजपुरवठा थकीत देयकासाठी महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे ...

दोन दिवसांपासून हिस्सी अंधारात

हिस्सी : सेलू तालुक्यातील हिस्सी गावचा वीजपुरवठा थकीत देयकासाठी महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून अंधारात आहे.

वीज वितरण कंपनीच्या वतीने मागील महिनाभरापासून वीज देयकाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्याच अनुषंगाने हिस्सी येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या देयकाचा भरणा वेळेत केला नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने हिस्सी येथील वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. जोपर्यंत थकीत बिलाची वसुली होणार नाही. तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जनार्दन सोनटक्के यांनी सांगितले.

अपघाताच्या घटना वाढल्या

चारठाणा : जिंतूर-जालना या महामार्गावर मागील महिनाभरापासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रात्री-अपरात्री या रस्त्यावरून वाहनधारक भरधाव वेगाने आपली वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. शुक्रवारी एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे याकडे महामार्ग पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वीज वितरण कंपनीविरुद्ध तीव्र संताप

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मीटर रीडिंग घेण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने दहाहून अधिक एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या एजन्सी प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन रीडिंग घेत नाहीत. मात्र, प्रत्येक महिन्याला अंदाजे बिले पाठविली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वापरापेक्षा अधिकची बिले येत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

संदलापूर-कात्नेश्वर रस्त्याची दुरवस्था

पूर्णा : तालुक्यातील संदलापूर ते कात्नेश्वर या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पूर्णा शहर गाठण्यासाठी हा रस्ता जवळचा म्हणून वाहनधारक पसंती देत आहेत. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने बांधकाम विभागाविरुद्ध वाहनधारक संताप व्यक्त करीत आहेत.

बांधकामधारक हैराण

देवगावफाटा : एकीकडे वाळू मिळत नसल्याने बांधकामधारक चिंताग्रस्त असताना दुसरीकडे विटांचे भावही ५ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईने बांधकाम करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. बांधकामधारकांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने वाळू सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.