शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दहावीच्या विद्यार्थ्यांबाबतच्या सीबीएसईच्या निर्णयाविषयी नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST

परभणी : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन अर्थात, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय बोर्डाच्या वतीने घेण्यात ...

परभणी : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन अर्थात, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय बोर्डाच्या वतीने घेण्यात आला आहे. बोर्डाच्या या निर्णयाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम केला आहे. त्यामध्ये दहावीच्या परीक्षेत एकाही विद्यार्थ्यांना नापास न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तसेच दहावीची टक्केवारी बेस्ट ऑफ फाइव्ह सब्जेक्टच्या आधारावर ठरविली जाणार आहे. बोर्डाच्या निर्णयाविषयी अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे झाले, तर विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची कमी होईल. परीक्षेचे त्यांना महत्त्व वाटणार नाही. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचे मत पालकांसह शिक्षकांनीही व्यक्त केले आहे.

काय आहे नवीन नियम

सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार, दहावीच्या परीक्षेत पास किंवा नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त ५ विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्याचा विचार केला जाईल. या पाच विषयांत पाच म्हणजेच दहावी पास, असा निर्णय झाला आहे.

पालकांच्या प्रतिक्रिया

सीबीएसईचा निर्णय समर्थनीय नाही. कारण उच्च दर्जाच्या शिक्षण पद्धतीत यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल. परीक्षेचे महत्त्व वाटणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षिणक वाटचालीस अडथळा निर्माण होईल. मागणी नसताना हा निर्णय झाला आहे.

- प्रा.प्रमोद ढालकरी, पालक, सेलू

सीबीएसई अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश हा काठिन्य पातळीचे शिक्षण असा आहे. आता विद्यार्थ्यांना नापासच करायचे नसेल, तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कस लागणार नाही, तसेच पाल्याची गुणवत्ता काय आहे, हे पालकांना कळणार नाही. त्यामुळे हा चुकीचा निर्णय आहे.

- दादाराव ताठे, पालक, सेलू

विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे. नापासच करायचे नाही, ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी कळणार? परीक्षेवरूनच विद्यार्थ्यांनी भविष्यात काय? करायचे हे ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नापास करायचे नसेल, तर परीक्षेची गरज काय?

- प्रणाली दुकले, विद्यार्थिनी, सोनपेठ