शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

अपात्र लाभार्थ्यांवर कार्यवाहीचे गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा परित्यक्त्या व दिव्यांग या पाच योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ९६ हजार ७३६ लाभार्थी ...

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा परित्यक्त्या व दिव्यांग या पाच योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ९६ हजार ७३६ लाभार्थी आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १८ हजार २, श्रावणबाळ योजनेंतर्गत ४२ हजार १७९, वृद्धापकाळ योजनेंतर्गत ३५ हजार ८१, विधवा योजनेंतर्गत १ हजार ३१७, तर दिव्यांगांमध्ये १५७ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

या लाभार्थ्यांना प्रतिमहा एक हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यातही शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध अर्थसाहाय्य योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा शोध जिल्ह्यात घेतला जात आहे. त्यामुळे या योजनेतील लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान थांबवून त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वेळेत मिळेना अनुदान

निराधार योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान दर महिन्याला न मिळता तीन महिने किंवा सहा महिन्यांनी मिळत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे.

श्रावणबाळ योजना

श्रावणबाळ योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४२ हजार लाभार्थ्यांचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. यामध्ये बोगस लाभार्थी आढळल्यास त्याचे अनुदान थांबविण्यात येते.

संजय गांधी योजना

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यात अठरा हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचा दर सहा महिन्यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जातो.

इंदिरा गांधी योजना

इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना समाविष्ट करतानाच त्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येते. अर्जांमध्ये वस्तुनिष्ठता आढळल्यास संबंधित लाभार्थ्याला या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ दिला जातो.

निराधारांची ससेहोलपट

पात्र लाभार्थ्यांनाच अनुदान मिळावे, या उद्देशाने शासनाने हयात प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची योजना सुरू केली. मात्र, अशिक्षित, वृद्ध लाभार्थ्यांची या प्रमाणपत्रासाठी ससेहोलपट होते.