शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अपात्र लाभार्थ्यांवर कार्यवाहीचे गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा परित्यक्त्या व दिव्यांग या पाच योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ९६ हजार ७३६ लाभार्थी ...

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा परित्यक्त्या व दिव्यांग या पाच योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ९६ हजार ७३६ लाभार्थी आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १८ हजार २, श्रावणबाळ योजनेंतर्गत ४२ हजार १७९, वृद्धापकाळ योजनेंतर्गत ३५ हजार ८१, विधवा योजनेंतर्गत १ हजार ३१७, तर दिव्यांगांमध्ये १५७ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

या लाभार्थ्यांना प्रतिमहा एक हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यातही शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध अर्थसाहाय्य योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा शोध जिल्ह्यात घेतला जात आहे. त्यामुळे या योजनेतील लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान थांबवून त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वेळेत मिळेना अनुदान

निराधार योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान दर महिन्याला न मिळता तीन महिने किंवा सहा महिन्यांनी मिळत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे.

श्रावणबाळ योजना

श्रावणबाळ योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४२ हजार लाभार्थ्यांचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. यामध्ये बोगस लाभार्थी आढळल्यास त्याचे अनुदान थांबविण्यात येते.

संजय गांधी योजना

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यात अठरा हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचा दर सहा महिन्यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जातो.

इंदिरा गांधी योजना

इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना समाविष्ट करतानाच त्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येते. अर्जांमध्ये वस्तुनिष्ठता आढळल्यास संबंधित लाभार्थ्याला या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ दिला जातो.

निराधारांची ससेहोलपट

पात्र लाभार्थ्यांनाच अनुदान मिळावे, या उद्देशाने शासनाने हयात प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची योजना सुरू केली. मात्र, अशिक्षित, वृद्ध लाभार्थ्यांची या प्रमाणपत्रासाठी ससेहोलपट होते.