शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला

By ज्ञानेश्वर भाले | Updated: February 14, 2023 17:04 IST

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

परभणी : गेल्या काही दिवसापासून राज्यात सूडबुद्धीचे राजकारण पेरल्या जात असून बड्या नेत्यांकडून कटकारस्थाने रचली जात आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना होती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले आहे. परंतु त्यांचे हे वक्तव्य ऑफ कॅमेरा असल्याची चित्रफिती पुढे आल्याने त्यांनी ऑफ नव्हे तर ऑन कॅमेराच बोलावं, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर परभणीतील मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला. 

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडून पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांची संमती होती, असे वक्तव्य केले आहे. परंतु या वक्तव्याचे चित्रफिती पाहिली असता त्यात त्यांनी हे मी ऑफ कॅमेरा सांगतोय, असे दिसून येत असल्याचे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फडणवीस यांनी ऑफ कॅमेरा बोलण्यापेक्षा ऑन कॅमेरा जे काही असेल ते सत्य बोलावे आणि राज्याला खरी काय ती परिस्थिती सांगावी, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले. 

सुसंस्कृतपणा घालवलादेवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुसंस्कृतपणा आणि विकासात्मक चेहरा म्हणून आम्ही पाहत होतो. परंतु अलीकडच्या काळात त्यांची प्रतिमा पूर्णतः बदलली आहे. विकासात्मक बाबीवर चर्चा, वादविवाद होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही दिवसापासून सूडबुद्धीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या विकासाची वाताहत होत असल्याचा आरोप सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केला.

घोषणांचा पाऊस, निधीचा दुष्काळकेंद्र सरकारने नुकतीच बजेटची मांडणी केली. यात नागरिकांसाठी विविध घोषणांचा पाऊस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाडला. परंतु त्या योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या बजेटची तरतूदच केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे घोषणा केल्या मात्र त्याची पूर्तता होणार नसल्याची स्थिती आहे.

सरकारकडून सूडाच्या राजकारणाला खतपाणीगेल्या काही दिवसापासून केंद्र आणि राज्य सरकार सूडाच्या राजकारणाला खतपाणी घातले जात आहे. विकासात्मक बाबीला बाजूला ठेवून सत्ता समीकरणाची गणिते जुळवली जात असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सर्व सामन्यांचे प्रश्न, समस्या, बेरोजगारी यावर बोलायला सरकारला वेळ नाही. महागाईचा उच्चांक १०.१ वर पोहोचला असून गेल्या दहा वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. ईडी  (शिंदे-फडणवरस) सरकार विकासात्मक मुद्दे बाजुला ठेऊन सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुळे यांनी पत्रपरिषदेत केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाparabhaniपरभणी