शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पिके करपून चालली, प्रशासन निर्णय घेईना; संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले कालव्याचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 18:44 IST

पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत जलसमाधी आंदोलन केले होते.

- विठ्ठल भिसेपाथरी : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून हादगाव येथील चारी क्रमांक 49 वर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधी आंदोलन केले. मात्र प्रशासनाकडून पाणी सोडण्याचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडत करपून जाणाऱ्या पिकांना जीवनदान दिले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन 28 जानेवारीपासून सोडण्यात आले आहे.  तर पाथरी तालुक्यात 11 फेब्रुवारी पासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पैठण धरणातून डाव्या कालव्यात 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मात्र, पाथरी तालुक्यातील हदगाव येथील चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडण्यात आले नव्हते. पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणी सांगत पाणी सोडण्यास दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी गुरुवारी वरखेड हादगाव येथे कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. आंदोलन स्थळी जायकवाडीच्या उपविभागीय अभियंता भेट दिली घटनास्थळी पाथरीचे पोलीस निरीक्षक ही दाखल झाले पाणी सोडल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. 

अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले पाणी दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास स्वतःच डाव्या कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडून घेतले आहे. 

आठ दिवसांत पाणी सोडणार सध्या डाव्या कालव्यामध्ये पाणी पातळी कमी आहे. पातळी वाढल्यानंतर चारीत पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी किमान आठ दिवस लागतील. शेतकऱ्यांनी चारीतून पाणी सोडून घेतले असले तरी बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे चे उपअभियंता पवार यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीWaterपाणी