शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पिके करपून चालली, प्रशासन निर्णय घेईना; संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले कालव्याचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 18:44 IST

पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत जलसमाधी आंदोलन केले होते.

- विठ्ठल भिसेपाथरी : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून हादगाव येथील चारी क्रमांक 49 वर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधी आंदोलन केले. मात्र प्रशासनाकडून पाणी सोडण्याचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःच कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडत करपून जाणाऱ्या पिकांना जीवनदान दिले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन 28 जानेवारीपासून सोडण्यात आले आहे.  तर पाथरी तालुक्यात 11 फेब्रुवारी पासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पैठण धरणातून डाव्या कालव्यात 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मात्र, पाथरी तालुक्यातील हदगाव येथील चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडण्यात आले नव्हते. पिके करपून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणी सांगत पाणी सोडण्यास दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी गुरुवारी वरखेड हादगाव येथे कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. आंदोलन स्थळी जायकवाडीच्या उपविभागीय अभियंता भेट दिली घटनास्थळी पाथरीचे पोलीस निरीक्षक ही दाखल झाले पाणी सोडल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. 

अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच सोडले पाणी दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास स्वतःच डाव्या कालव्यातून चारी क्रमांक 49 मध्ये पाणी सोडून घेतले आहे. 

आठ दिवसांत पाणी सोडणार सध्या डाव्या कालव्यामध्ये पाणी पातळी कमी आहे. पातळी वाढल्यानंतर चारीत पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी किमान आठ दिवस लागतील. शेतकऱ्यांनी चारीतून पाणी सोडून घेतले असले तरी बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे चे उपअभियंता पवार यांनी दिली. 

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीWaterपाणी