शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

CoronaVirus : आम्ही एक वेळ जेवण करु; पण जनावरांचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:52 IST

या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत. 

ठळक मुद्देसंचारबंदीचा परिणाममुक्या जनावरांचे होताहेत हाल

परभणी : कोरोना या आजाराची लागण होऊ नये म्हणून शासनाने २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ सुरु केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत. 

नवीन मोंढा येथे जवळपास २५ बैलगाडी चालक असून बैलगाडी हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे; परंतु, गेल्या १३ दिवसांपासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या आयुष्यात अशी वेळ कधीच आलीच नव्हती ती लॉकडाऊनने आमच्यावर आणली आहे. आम्ही एकवेळ जेवण करुन राहू शकतो; परंतु, आमचा ज्यावर उदरनिर्वाह चालतो त्या मुक्या जनावरांचे काय, असा प्रश्न शेख महेमूद शेख मस्तान, शेख मोहसीन शेख यासीन, शेख तुराब शेख रियाज, शेख अन्वर शेख हबीब, शेख हसन शेख पाशा या बैलगाडी चालकांनी केला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून वैरणीचे दरही वाढले आहेत. २० रुपयाला मिळणारी पेंढी आता २५ रुपयाला मिळत आहे. हिवाळा व पावसळा हिरवा चारा बैलांना मिळू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवा चाराही मिळणे शक्य होत नाही. घरी बसावे तर लेकराबाळांना काय खाऊ घालावे आणि बाहेर निघावे तर लॉकडाऊन, या परिस्थितीमुळे आमची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीप्रमाणे झाली आहे, असे ते म्हणाले.

‘कामाला येतो; पण आंतराने बसतो’कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून आम्ही शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करीत आहोत. हाताला काम मिळावे, म्हणून आजही आम्ही लॉकडाऊन असले तरी मोंढ्यात येवून बसत आहोत. बैलगाडी सावलीच्या ठिकाणी बांधून बैलांना वरण टाकून आंतराअंतराने बसतो. यापूर्वी  दिवसाकाठी हजार-बाराशे रुपये मिळायचे; परंतु, कोरोना या आजारामुळे दोनशे रुपये मिळणेही मुश्कील झाले आहे. कधी-कधी तर पेंढीचे दुकान बंद असल्यामुळे बैलांना वैरणही टाकू शकत नाही, याची मनाला खंत वाटते, असे बैलगाडी चालक म्हणले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी