शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

coronavirus : शेवडी गाव सील; जिंतूर शहर परिसरात संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:26 IST

जिंतूर शहरासह ३ कि.मी.च्या परिसरात १६ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्कजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शेवडी गाव सील 

जिंतूर:  तालुक्यातील शेवडी येथे मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास विशेष आदेश काढून शेवडी गाव सील केले आहे. तर जिंतूर शहरासह ३ कि.मी.च्या परिसरात १६ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबई येथील एक पोलीस कर्मचारी कुटुंबियांसह जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावी आला होता. या कर्मचाऱ्याने कुटुंबियांसह स्वत:ची येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घेतली. त्यानंतर या कुटुंबियास जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. येथे त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल गुरुवारी रात्री आला. त्यामध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी या कर्मचाऱ्याची पत्नी व दोन मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विशेष आदेश काढून शेवडी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच जिंतूर नगरपरिषद हद्द आणि ३ कि.मी.च्या परिसरात १६ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदी काळात इतर कोणताही व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, असेही या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी