शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Coronavirus In Parabhani : बडेजावाचा थाट... अनेकांची लावून गेला वाट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:18 IST

स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सद्गुणाचा सुगंध मैलावरुनही येतो, असे म्हटले जाते; परंतु, गंगाखेड येथील एका व्यापाऱ्याला स्वत:च्या संपत्तीचे आणि ऐश्वर्याचे कोरोनाच्या संकटात प्रदर्शन करण्याचा मोह टाळता आला नाही.

- अभिमन्यू कांबळे

परभणी : कोरोनाच्या संकट काळात सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवून स्वत:ची संपत्ती व ऐश्वर्याचा दिखाऊपणा करण्यासाठी गंगाखेड येथील व्यापाऱ्याने केलेल्या बडेजावाचा थाट अनेकांची वाट लागून गेला आहे. त्यामुळे जवळपास १०० जण कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची गंभीर स्थिती पहावयास मिळत आहे.

स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सद्गुणाचा सुगंध मैलावरुनही येतो, असे म्हटले जाते; परंतु, गंगाखेड येथील एका व्यापाऱ्याला स्वत:च्या संपत्तीचे आणि ऐश्वर्याचे कोरोनाच्या संकटात प्रदर्शन करण्याचा मोह टाळता आला नाही. २५ जून रोजी मुलाचा लातूर येथे विवाह समारंभ झाल्यानंतर २८ जून रोजी गंगाखेड येथे ठेवलेला स्वागत सोहळा जिल्हावासियांच्या मुळावर आला आहे. सर्वसामान्य व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी घ्यायची म्हटलं तर भलेमोठ्या नियमांची यादी दिली जाते. शिवाय नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा दमही दिलेला असतो. 

गंगाखेडचा कार्यक्रम मात्र सर्व नियम ढाब्यावर बसवून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार, खासदार, महसूल, पोलीस आदी विभागातील अधिकारी, उद्योजक, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्तींनी हजेरी लावली. त्यांना चांदीच्या ताटात जेवण दिले. आणि त्यातील काहींना जाताजाता कोरोना प्रसादही दिला गेला, अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. स्वागत समारंभ आयोजित केलेल्या व्यापाऱ्याच्या घरातील वृद्ध महिला ५ जुलै रोजी कोरोनाबाधित निघाली. त्यानंतर या कार्यक्रमाला हजेरी लावेल्या जवळपास १०० जणांना आतापर्यंत कोरोनाने घेरले आहे. 

जिल्हा प्रशासनाने रॅपीड टेस्ट करण्यासाठी खास गंगाखेडसाठी अ‍ॅन्टीजेन कीट मागविल्या. त्याद्वारे जवळपास ३३६ व्यक्तींची तपासणी केली. अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या मनामध्ये सातत्याने आपण पॉझिटिव्ह तरी येणार नाही ना, याची भीती कायम आहे. अशातच गंगाखेड शहरातील दोन व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे क्वारंटाईन असलेल्या व गंगाखेड शहरातील प्रत्येक व्यक्तीला आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना एक-एक दिवस काढणे अवघड जात आहे. त्यांची मानसिक स्थिती, सातत्याने येणाऱ्या कोरोनाच्या बातम्या यामुळे हे सर्व व्यक्ती आज घडीला जीवनमरणाच्या यातना सहन करीत आहेत. मानिसकदृष्ट्या त्रस्त  आहेत. 

या सर्व परिस्थितीला गंगाखेड येथील संबंधित व्यापारी आणि या व्यापाऱ्यास असा जाहीर कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध न करता साथ देणारे अधिकारी, राजकीय नेते जबाबदार आहेत. हजारो लोकांना संकटाच्या खाईत लोटणाऱ्या या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा प्रशासनाने स्वत:हून उगारावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती; परंतु, त्याकडे कानाडोळा करण्यात आला. शेवटी पत्रकार आणि काही सुजान नागरिकांच्या दबावातून विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधित व्यक्तीकडून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या प्रति व्यक्तीच्या खर्चापोटी ५ हजार तर क्वारंटाईन  प्रति व्यक्तीच्या खर्चापोटी २ हजार रुपये असा एकूण ५ लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी तशी नोटीस काढण्याची सूचना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिली. कंकाळ यांनी ११ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजक राधेशाम रतनलाल भंडारी यांना नोटीस बजावली. त्यात ७ दिवसांत ५ लाख रुपयांची रक्कम भरावी, असे सूचित करण्यात आले; परंतु, गेल्या ८ दिवसांपासून ही नोटीस संबंधितांना तामीलच झाली नाही. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था किती तकलादू आहे, याचे उदाहरण पहावयास मिळत आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे म्हणतात. आता कायद्याचे पालन न करणाऱ्या आणि ज्यांच्यावर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, अशा नाठाळांवर भारतीय संविधानातील कलमांची काठी जोरात हाणली पाहिजे. तरच बडेजावाचा थाट करुन अनेकांची वाट लावणाऱ्यांना जरब बसेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी