शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : गावाच्या मुख्य रस्त्यावरच प्रवेश बंदीचे फलक; संचारबंदीचे गांभिर्य ग्रामस्थांमध्येच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 19:04 IST

संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़

ठळक मुद्देगावात मुख्य रस्त्यांवर प्रवेश बंदीचे लावले फलक शहरातील गर्दी होईना कमी

- ज्ञानेश्वर रोकडे 

जिंतूर:  कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेतले आहेत; परंतु, शहरात नियमांचे पालन करणा-यांपेक्षा नियम मोडणा-यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे़ याउलट ग्रामीण भागात मात्र ग्रामस्थांकडून अधिक सतर्कता बाळगून गावात प्रवेश करणा-या मुख्य रस्त्यांवर बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदीचे फलक लावल्याचे तालुक्यात ठिक ठिकाणी दिसून येत आहे़ त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगली जात असल्याचे सोमवारी दिसून येत आहे. 

राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे़ या काळामध्ये नागरिकांना काही नियम घालून दिले आहेत़ विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सचा वापर करावा आदी नियम घालून दिले आहेत़ असे असतानाही नागरिकांकडून मात्र या नियमांना बगल दिली जात आहे़ 

संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़ जिंतूर-औंढा रस्त्यावर औद्योगिक वसाहत, बलसा रस्ता या भागातही सकाळ, सायंकाळी वॉक करणे त्याचबरोबर भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडून सोशल डिस्टन्सच्या नियमाला बगल देणे आदी प्रकार शहरात सर्रास दिसून येत आहेत़ तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणत आहेत़

तालुक्यातमील बहुतांश गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून गावातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते निर्जंतूक राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ त्याचबरोबर बाहेरगावाहून आलेल्या ग्रामस्थांसोबत सोशल डिस्टन्सचा वापर करूनच व्यवहार केला जात आहे़  त्याचबरोबर तालुक्यातील काही गावांनी तर बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश देण्यास बंदी घातली आहे़ त्या संदर्भातील फलक गावात प्रवेश मुख्य रस्त्यांवर लावले आहेत़ त्याबरोबर सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य कर्मचारी, जनजागृती करून, हात धुणे, स्वच्छता ठेवणे, विनाकारण घोळक्याने गप्पा मारू नये आदीबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत; परंतु, शहरात मात्र उलट परिस्थिती दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे़ 

चामणीत गावबंदी फलकजिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाहेरच्या नागरिकांना फलक दिला जात नाही़ विशेष म्हणजे गावातील नागरिकही गावाच्याबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे़ अशातच चामणी येथील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात येणाºया मुख्य रस्त्यावर कोरोनामुळे बाहेरील व्यक्तीस गावात येण्यास बंदी असल्याचा बोर्ड ग्रामपंचायतीकडून लावण्यात आला आहे़ त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे़ 

शहरात रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फडजिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक, ग्रीन पार्क, शिवाजी नगर, आनंद नगर, लेक्चर कॉलनी, बलसा रस्ता, साई मंदिर या परिसरात जवळपास ५० टक्के नागरिक सुशिक्षित आहेत; परंतु, संचारबंदीच्या काळातही नेहमीप्रमाणेच गप्पागोष्टी करण्यासाठी दररोज रात्री उशिरापर्यंत घोळक्याने बसत असल्याचे रविवारी रात्री केलेल्या पाहणीत दिसून आले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी