शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

CoronaVirus : गावाच्या मुख्य रस्त्यावरच प्रवेश बंदीचे फलक; संचारबंदीचे गांभिर्य ग्रामस्थांमध्येच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 19:04 IST

संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़

ठळक मुद्देगावात मुख्य रस्त्यांवर प्रवेश बंदीचे लावले फलक शहरातील गर्दी होईना कमी

- ज्ञानेश्वर रोकडे 

जिंतूर:  कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेतले आहेत; परंतु, शहरात नियमांचे पालन करणा-यांपेक्षा नियम मोडणा-यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे़ याउलट ग्रामीण भागात मात्र ग्रामस्थांकडून अधिक सतर्कता बाळगून गावात प्रवेश करणा-या मुख्य रस्त्यांवर बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदीचे फलक लावल्याचे तालुक्यात ठिक ठिकाणी दिसून येत आहे़ त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगली जात असल्याचे सोमवारी दिसून येत आहे. 

राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे़ या काळामध्ये नागरिकांना काही नियम घालून दिले आहेत़ विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सचा वापर करावा आदी नियम घालून दिले आहेत़ असे असतानाही नागरिकांकडून मात्र या नियमांना बगल दिली जात आहे़ 

संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामे नसतानाही शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत़ जिंतूर-औंढा रस्त्यावर औद्योगिक वसाहत, बलसा रस्ता या भागातही सकाळ, सायंकाळी वॉक करणे त्याचबरोबर भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडून सोशल डिस्टन्सच्या नियमाला बगल देणे आदी प्रकार शहरात सर्रास दिसून येत आहेत़ तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणत आहेत़

तालुक्यातमील बहुतांश गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून गावातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते निर्जंतूक राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ त्याचबरोबर बाहेरगावाहून आलेल्या ग्रामस्थांसोबत सोशल डिस्टन्सचा वापर करूनच व्यवहार केला जात आहे़  त्याचबरोबर तालुक्यातील काही गावांनी तर बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश देण्यास बंदी घातली आहे़ त्या संदर्भातील फलक गावात प्रवेश मुख्य रस्त्यांवर लावले आहेत़ त्याबरोबर सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य कर्मचारी, जनजागृती करून, हात धुणे, स्वच्छता ठेवणे, विनाकारण घोळक्याने गप्पा मारू नये आदीबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत; परंतु, शहरात मात्र उलट परिस्थिती दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे़ 

चामणीत गावबंदी फलकजिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाहेरच्या नागरिकांना फलक दिला जात नाही़ विशेष म्हणजे गावातील नागरिकही गावाच्याबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे़ अशातच चामणी येथील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात येणाºया मुख्य रस्त्यावर कोरोनामुळे बाहेरील व्यक्तीस गावात येण्यास बंदी असल्याचा बोर्ड ग्रामपंचायतीकडून लावण्यात आला आहे़ त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे़ 

शहरात रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फडजिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक, ग्रीन पार्क, शिवाजी नगर, आनंद नगर, लेक्चर कॉलनी, बलसा रस्ता, साई मंदिर या परिसरात जवळपास ५० टक्के नागरिक सुशिक्षित आहेत; परंतु, संचारबंदीच्या काळातही नेहमीप्रमाणेच गप्पागोष्टी करण्यासाठी दररोज रात्री उशिरापर्यंत घोळक्याने बसत असल्याचे रविवारी रात्री केलेल्या पाहणीत दिसून आले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी