शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

मतदानावरून परतल्यानंतर कोरोनाच्या चाचणीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:15 AM

परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची परतल्यानंतर कोरोना चाचणी झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल ...

परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची परतल्यानंतर कोरोना चाचणी झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हास्तरावरून अनेक कर्मचारी ग्रामीण भागात मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी पोहोचले. सकाळी ७.३० वाजेपासून ते ५.३० वाजेपर्यंत हे कर्मचारी अनेक नागरिकांच्या संपर्कात आले. त्यामुळे निवडणुकीहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोनाचा चाचणी करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची चाचणी झाली नाही. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उमेदवारांचीही कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना होत्या. मात्र त्याकडेही फारासे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी २५ टक्के उमेदवारांच्याच चाचण्या करण्यात आल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तर निवडणुकीपूर्वीही चाचण्या झाल्या नाहीत. आणि निवडणूक पार पडल्यानंतरही या चाचण्या करण्यात आल्या नाहीत. काही लक्षणे आढळली तर स्वत:च चाचणी करून घेऊन असे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, प्रशासनाने मात्र या चाचण्या न केल्याचे समोर आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर परतलेल्या काही कर्मचाऱ्यांनी स्वत:हूनच आरोग्याची काळजी घेण्याचे ठरविले आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने काळजी करण्याचे कारण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने त्याकडे काणाडोळा केला.