शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला ३ हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. ...

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. अनलॉक प्रक्रियेनंतर काही अटींच्या अधिन राहून लग्न सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली असली तरी कोरोनाची नागरिकांच्या मनात धास्ती कायम होती. त्यामुळे नियोजित विवाह सोहळ्यांवर परिणाम झाला असेल, असे सर्वसामान्यांना वाटत होते; परंतु प्रत्यक्षात हा समज खोटा ठरला आहे. जिल्ह्यात कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार लग्न विवाह सोहळे पार पडले आहे. लग्न केल्यानंतर शासन नियमानुसार त्याची संबंधित शासकीय कार्यालयात नोंद करणे आवश्यक आहे. त्यानुसार परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करण्यात आलेल्या नोंदणीनुसार २०२० या वर्षी परभणी तालुक्यात ५२ दाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी केली. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाचे संकट अधिक गडद असतानाही गेल्या दोन महिन्यात ११ दाम्पत्यांनी परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विवाहाची नोंद केली आहे. अनेकांनी मात्र नोंदणी केलेली नाही.

वर्षभरात २७ लग्नतिथी

गत वर्षी १० मार्चपासून विवाह मुहूर्त सुरू झाले होते; परंतु कोरोनामुळे राज्यात १८ मार्चपासून प्रतिबंध लागू करण्यात आले. २२ मार्चपासून तर देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या वर्षात मार्चनंतर अनेक विवाह मुहूर्त होते. त्यात १६, १७, २५, २६ एप्रिल, १, २, ४, ५, ६, १५, १७, १८, २३ मे, ११, १५, १७, २७, २९, ३० जून, २७, २९, ३० नोव्हेंबर, १,७,९, १०, ११ डिसेंबर या कालावधीत विवाह मुहूर्त होते; परंतु कोरोनामुळे या विवाह सोहळ्यावर परिणाम झाला.

६३ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे तालुक्यातील ५२ विवाह सोहळ्याची २०२० या वर्षात नोंद झाली आहे. ही आकडेवारी परभणीपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार विवाह सोहळे झाले आहेत. त्याच्या नोंदी मात्र स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर पालिका कार्यालयात नाहीत.

एप्रिल कठीण

चालू वर्षात आतापर्यंत ११ विवाह सोहळ्याची परभणीतील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंद झाली आहे. चालू एप्रिल महिन्यात २२, २४, २६, २७, २८, २९, ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत; परंतु ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने प्रशासनाच्या नियमामुळे विवाह होणे कठीण आहे.

दोन वर्षात सर्व लग्न रद्द झाल्याने नुकसान झाले आहे. मंगल कार्यालयात दुरुस्ती, नवीन कामे मागील वर्षी केली, त्याचा खर्च अद्याप निघाला नाही. वरून विजेचे बिल घरातून भरण्याची वेळ आली आहे.

- प्रमोद वाकोडकर, अध्यक्ष, जिल्हा मंगल कार्यालय संघटना.