शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दरोडेखोर, उद्धव यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:56 IST

पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं.

परभणी : पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं. ते वाचा आणि मग, मी तुम्हा काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना प्रश्न विचारतो, स्वत: घोटाळेबाज असताना आमच्यावर आरोप करता, तुम्हाला लाज वाटते का, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली़परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्यावर शरद पवारांना दुष्काळ असल्याचे कळले़पण, गेली पाच वर्षे शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत़ तेव्हा हे राष्ट्रवादीवाले घरामध्ये स्वत:ला कोंडून घेऊन बसले होते़ चारा छावणीला शरद पवारांनी भेट दिल्यानंतर एक गंमत मला कळली, तिथली लोकं घाबरली होती़ त्यांना मी का घाबरलात असे विचारले असता, ते म्हणाले की, गेल्या वेळी यांचं सरकार होतं, त्यावेळी यांनी शेण घोटाळा केला होता़ काय खायचं सोडलं नव्हतं़ शेण सुद्धा खाल्लं होतं त्यांनी. आता यांना दुष्काळग्रस्तांचा कळवळाआला आहे़ तुम्ही फिरतांय, कितीही फिरा, पण जो जोश भगव्यामध्येतो तुमच्या पक्षाच्या फडक्यामध्ये नाही़आमच्याकडे जोश आहे, तुमच्याकडे द्वेष आहे़ भ्रष्टाचाराचे आरोप कोणावर करतायं? स्वत: घोटाळेबाज आहात तुम्ही आणि चोर म्हणून युतीवर आरोप करता? दरोडेखोरांनी चोर कोण आहे ते ठरवायचा हा कोणता न्याय?, असा सवाल उद्धव यांनी केला.>‘शरद पवारांचे राजकारण संपले’एकदा सभेत मी लोकांना विचारलं, शरद पवारांची ओळख काय? तर लोकं म्हणाली भ्रष्टवादी़ मग शरद पवार पंतप्रधान चालतील का? असा प्रश्न करताच ते म्हणाले, ‘शरद पवारांना सांगा तुमचं राजकारण संपलयं़’

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019parbhani-pcपरभणी