शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यातील बससेवा सोमवारपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

जिल्ह्यातील कोरोनाचा संसार मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व सेवा सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु याचदरम्यान मागील आठवड्यात ...

जिल्ह्यातील कोरोनाचा संसार मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व सेवा सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु याचदरम्यान मागील आठवड्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यस्तरावरून निर्बंध वाढविण्याचे नियोजन केले होते. या आदेशाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने २९ जून ते ३ जुलै या पाच दिवसांच्या काळात खाजगी प्रवासी वाहतूक तसेच एसटी महामंडळाची सेवा बंद केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला दररोज २० लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला. इतर जिल्ह्यांत बससेवा सुरू असताना परभणी जिल्ह्यात मात्र ती बंद असल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती.

दरम्यान, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढून एसटी महामंडळाची सेवा तसेच खाजगी प्रवासी वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

लोकमतच्या वृत्ताची दखल

दरम्यान, जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा बंद असल्याने होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा संदर्भ घेऊन ‘लोकमत’ने ३ जुलै रोजीच्या अंकात ‘पाच दिवसांत एसटीला १ कोटीचा फटका’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. कोरोना संसर्गामुळे एसटीचे होत असलेले कोट्यवधींचे नुकसान निदर्शनास आणून दिले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत शनिवारी आदेश काढले.