शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST

परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली ...

परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली आहे. मात्र ही पिके बहरात असताना जिल्ह्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर निम्न दुधना व येलदरी, माजलगाव येथील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पुराच्या पाण्याने व अतिवृष्टीने मातीत मिसळले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार मोबाइल नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळविण्याची त्रासदायक अट होती. त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम व इतर अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक लावून पिकांच्या नुकसानीचा सहा पर्यायाचा माध्यमातून अर्ज सादर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे आहेत नवीन सहा पर्याय

१) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज कृषी विभागात सादर करता येऊ शकतो.

२) शेतकऱ्यांनी ज्या बँकेकडून पीक कर्ज मिळविले आहे. त्या बँकेततही परिपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल करू शकतो.

३) शेतकऱ्यांना वरील दोन्ही पर्याय किचकट वाटत असतील तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयातही शेतकरी आपल्या नुकसानीचा प्रस्ताव दाखल करू शकतो.

४) तसेच विमा कंपनीच्या परभणी शहरातील दर्गारोडवरील कार्यालयातही ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतो.

५) त्याचबरोबर विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री १८००१०२४०८८ या क्रमांकावर ही फोन लावून आपल्या नुकसानीची माहिती देऊ शकतो.

६) तसेच विमा कंपनीच्या परभणी जिल्ह्यासाठी असलेल्या ई-मेलवर ही ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल करू शकतो.

१ लाख ६० हजार हेेक्टरवरील पिके बाधित

७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे कृषी विभाग व महसूल प्रशासनाचा अहवाल आहे.