शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST

परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली ...

परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली आहे. मात्र ही पिके बहरात असताना जिल्ह्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर निम्न दुधना व येलदरी, माजलगाव येथील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पुराच्या पाण्याने व अतिवृष्टीने मातीत मिसळले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार मोबाइल नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळविण्याची त्रासदायक अट होती. त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम व इतर अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक लावून पिकांच्या नुकसानीचा सहा पर्यायाचा माध्यमातून अर्ज सादर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे आहेत नवीन सहा पर्याय

१) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज कृषी विभागात सादर करता येऊ शकतो.

२) शेतकऱ्यांनी ज्या बँकेकडून पीक कर्ज मिळविले आहे. त्या बँकेततही परिपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल करू शकतो.

३) शेतकऱ्यांना वरील दोन्ही पर्याय किचकट वाटत असतील तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयातही शेतकरी आपल्या नुकसानीचा प्रस्ताव दाखल करू शकतो.

४) तसेच विमा कंपनीच्या परभणी शहरातील दर्गारोडवरील कार्यालयातही ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतो.

५) त्याचबरोबर विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री १८००१०२४०८८ या क्रमांकावर ही फोन लावून आपल्या नुकसानीची माहिती देऊ शकतो.

६) तसेच विमा कंपनीच्या परभणी जिल्ह्यासाठी असलेल्या ई-मेलवर ही ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल करू शकतो.

१ लाख ६० हजार हेेक्टरवरील पिके बाधित

७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे कृषी विभाग व महसूल प्रशासनाचा अहवाल आहे.