शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पाण्याच्या वादातून रक्त सांडले; सार्वजनिक पाणवठ्यावर महिलेचा खून, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 13:25 IST

सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले.

- असगर देशमुखचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र हाणामारीत होऊन तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्याने एक महिला ठार झाली तर अन्य एक युवक, एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २९ नोहेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधित दोन  जखमीवर जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

जिंतुर येथून परभणी रस्त्यावर पाच किलोमीटरवर पांगरी हे गाव असून गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. यात अचानक एकाने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत दोन महिला, एका तरुणास गंभीर जखमी केले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत ग्रामस्थांनी जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व इतरांनी जखमींना खासगी वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात डॉ.गरड, परिचारिका हरकळे, परिचारिका मते, गंगाधर पालवे आदींनी उपचार केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रुग्णालयात जिंतुरचे पोलीस निरिक्षक दिपक दंतुलवार, स.पो.नि.विलास कोकाटे, गोपीनाथ कोरके, मुरकुटे, लिला जोगदंड, ग्याळ आदींनी धाव घेत रुग्णालयात पंचनामा केला. 

दरम्यान, डाॅ.गरड यांनी तपासून सत्यभामा नागोराव मुंडे (३५, रा.जलालपुर, ता.औंढा) या महिलेस मृत घोषित केले. तर आशामती फकीरराव बुधवंत (४५, रा.पांगरी, ता.जिंतूर), ऋषिकेश नाथराव सांगळे (१८ रा.सांगळेवाडी ता.जिंतूर) या दोघांवर प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरुजिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक, ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. तसेच सदर घटनेसंदर्भात जिंतूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, चौकशी अंती सदर घटना नेमकी कशामुळे घडली. त्याचे नेमके कारण काय? हल्ल्यात किती जणांचा सहभाग होता ही बाब स्पष्ट होईल, असा पोलीसांचा कयास आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी