शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

'भाजप म्हणजे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती असलेली कौरव सेना': अशोक चव्हाण

By ज्ञानेश्वर भाले | Updated: March 31, 2023 18:23 IST

भाजपच्या एकाधिकारशाहीने लोकशाहीला तडा; लोकशाही बळकट करण्याचे आवाहन

परभणी : राज्यासह देशभरात भाजप सरकारकडून सूडबुद्धीच्या राजकारणावर अधिक भर दिला जात आहे. जो कुणी त्यांच्या चुकांवर बोट ठेवतो, त्यांच्यावर विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उभारण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत घेत भाजपच्या ध्येयधोरणावर टीका केली. जुनी प्रकरणे उकरून विरोधकांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र त्यांच्या माध्यमातून होत असून, तशीच काहीशी कारवाई काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावणे, त्यानंतर तातडीने त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना संसद म्हणून बाहेर करण्याचे षडयंत्र भाजपने केले. या सर्व प्रक्रिया इतक्या तातडीने करण्यामागे त्यांचा हेतू काय? असा प्रश्न देशभरातून उपस्थित होत आहे. जो कोणी भाजपच्या ध्येयधोरणावर किंवा त्यांच्या चुकांवर बोट ठेवेल त्यांच्यावर विविध शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचे काम राज्यासह देशातील भाजप सरकार करत असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून लोकशाही आणि संविधानाची गळचेपी करण्यात येत आहे. नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. सध्या देशभरात भाजपची एकाधिकारशाही सुरू असून, लोकशाहीला तडा जात आहे. त्यामुळे लोकशाहीला बळकट करण्यासाठी विविध पक्ष, संघटना, नागरिकांनी भाजपविरुद्ध लढा उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी यावेळी केले.

कौरव-पांडवांचे युद्धमहाभारताच्या रणांगणात जसे कौरव-पांडवांचे युद्ध झाले तसेच काहीसे युद्ध सध्या देशभरात भाजपविरुद्ध उभारण्यात येत आहे. भाजप कौरवांच्या भूमिकेत असून, त्यांच्याकडे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती आहे; परंतु आमच्याकडे सत्य असल्यामुळे आम्ही पांडवांच्या भूमिकेत त्यांच्याविरुद्ध लढत आहोत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकीत त्यांचा पराभव करून लढाई आम्ही जिंकणार, असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

आवाज दाबण्याचा प्रयत्नकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी यांच्यासह इतरांच्या बेनामी संपत्तीबाबत चौकशीची मागणी केली होती. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केल्याने राहुल गांधी यांची ही भूमिका भाजपच्या जिव्हारी लागली. परिणामी त्यांचे जुने वक्तव्य उकरून काढत त्यांना कोंडीत पकडले. त्यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्याचा खटला गुजरातच्या न्यायालयात चालतो, याच्यापेक्षा दुसरी दुर्भाग्य काय म्हणावे, असा सवाल चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसparabhaniपरभणी