शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कलापथकाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

उपलब्ध पाण्यावर वाढले सिंचन परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने रबी हंगामात मोठ्या प्रमाणात सिंचन झाले ...

उपलब्ध पाण्यावर वाढले सिंचन

परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने रबी हंगामात मोठ्या प्रमाणात सिंचन झाले आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी सिंचन क्षेत्र वाढले आहे. जायकवाडी, निम्न दुधना या दोन्ही प्रकल्पाचे तीन पाणी आवर्तन प्रथमच रब्बी हंगामात उपलब्ध झाले आहेत. याशिवाय येलदरी प्रकल्पातून शेतजमिनीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामात उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

वाळूची अवैध वाहतूक सुरूच

परभणी : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलीस प्रशासनन दररोज कारवाई करत आहे. मात्र, अजूनही वाळूची अवैध वाहतूक थांबलेली नाही. महसूल प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे नदीपात्रातून सर्रास वाळूचा उपसा करून त्याची बेभाव विक्री करण्याचा व्यवसाय अनेकांनी सुरू केला आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

परभणी : जिल्ह्यात अजूनही रब्बी हंगामातील पीक कर्जवाटप पूर्ण झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करून रब्बीची पेरणी करावी लागली. रब्बी हंगामात सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, बँक प्रशासनाने मनमानी कारभार करत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली. परिणामी उद्दिष्ट अधुरे राहिले आहे.

जिल्ह्यात वाढेनात रोहयोची कामे

परभणी : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करण्यास शासकीय यंत्रणा उदासीनता दाखवत आहेत. कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे सुरू केली जाऊ शकतात. मात्र, उदासीन धोरणांमुळे कामांची संख्या वाढली नाही. परिणामी मजुरांनी नोंदणी केल्यानंतरही त्यांना काम उपलब्ध होत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.

खड्ड्यांमुळे वाढला वाहनधारकांचा त्रास

परभणी : जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी चारही मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वसमत, जिंतूर, गंगाखेड आणि पाथरीकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असली तरी ही कामे संथगतीने होत आहेत. परिणामी त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

बसस्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी

परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी होत असून, कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. अनेक प्रवासी विनामास्क फिरतात. विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने एस.टी. महामंडळानेही या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.