शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST

परभणी : मे महिन्यातील २५ दिवसांत दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण ३०४ रुग्णांचा मृत्यू ...

परभणी : मे महिन्यातील २५ दिवसांत दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण ३०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने या महिन्यातही कोरोना संसर्गाने जिल्हावासीयांना चांगलेच जेरीस आणले आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने थोडीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. एप्रिल महिन्यात २२ हजार ५७८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर ४८५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मे महिन्याच्या २५ दिवसांत ११ हजार ८३६ रुग्णांची नोंद झाली असून, ३०४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचबबरोबर मृत्यूचे प्रमाणही अल्पप्रमाणात घटले आहे.

२५ ते १८ मे या आठवड्यात २ हजार ४५० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापूवीच्या १८ ते ११ मे या आठवड्यात २ हजार ७६८ रुग्ण नोंद झाले होते, तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत बाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचेच संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात संसर्ग कमी होत असल्याने ही समाधानाची बाब ठरत असली, तरी नागरिकांना अजूनही प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्स या नियमांचा आणखी कटाक्षाने अवलंब केला, तरच कोरोनावर लवकर मात करणे शक्य होणार आहे,

८९ टक्क्यांवर पोहोचले बरे होण्याचे प्रमाण

जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दरही मे महिन्यात वाढला आहे. मागच्या २५ दिवसांमध्ये ११ हजार ८३६ नवीन रुग्ण नोंद झाले असून, १५ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. चालू आठवड्यात मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. ११ ते १८ मे या आठवड्यात ५ हजार २५९ रुग्ण बरे झाले होते. मात्र १८ ते २५ मे या आठवड्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ १ हजार २५३ एवढीच आहे.

मूृत्यूचा दर २.४५ टक्क्यांवर

जिल्ह्यात मे महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर घटलेला नाही. २५ मे रोजी २ रुग्णांचा झालेला मृत्यू हा अपवाद वगळता आतापर्यंत सरासरी दररोज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. १ मे रोजी जिल्ह्यात मृत्यूचा दर २.४२ होता. तो आता २.४५ वर पोहोचला आहे.

एप्रिल महिन्यातील कोरोनाबाधित : २२५७८

एप्रिल महिन्यातील रुग्णांचे मृत्यू : ४८५

मे महिन्यातील कोरोनाबाधित : ११८३६

मे महिन्यातील एकूण मृत्यू : ३०४