शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST

परभणी : मे महिन्यातील २५ दिवसांत दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण ३०४ रुग्णांचा मृत्यू ...

परभणी : मे महिन्यातील २५ दिवसांत दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण ३०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने या महिन्यातही कोरोना संसर्गाने जिल्हावासीयांना चांगलेच जेरीस आणले आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने थोडीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. एप्रिल महिन्यात २२ हजार ५७८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर ४८५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मे महिन्याच्या २५ दिवसांत ११ हजार ८३६ रुग्णांची नोंद झाली असून, ३०४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचबबरोबर मृत्यूचे प्रमाणही अल्पप्रमाणात घटले आहे.

२५ ते १८ मे या आठवड्यात २ हजार ४५० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापूवीच्या १८ ते ११ मे या आठवड्यात २ हजार ७६८ रुग्ण नोंद झाले होते, तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत बाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचेच संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात संसर्ग कमी होत असल्याने ही समाधानाची बाब ठरत असली, तरी नागरिकांना अजूनही प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्स या नियमांचा आणखी कटाक्षाने अवलंब केला, तरच कोरोनावर लवकर मात करणे शक्य होणार आहे,

८९ टक्क्यांवर पोहोचले बरे होण्याचे प्रमाण

जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दरही मे महिन्यात वाढला आहे. मागच्या २५ दिवसांमध्ये ११ हजार ८३६ नवीन रुग्ण नोंद झाले असून, १५ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. चालू आठवड्यात मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. ११ ते १८ मे या आठवड्यात ५ हजार २५९ रुग्ण बरे झाले होते. मात्र १८ ते २५ मे या आठवड्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ १ हजार २५३ एवढीच आहे.

मूृत्यूचा दर २.४५ टक्क्यांवर

जिल्ह्यात मे महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर घटलेला नाही. २५ मे रोजी २ रुग्णांचा झालेला मृत्यू हा अपवाद वगळता आतापर्यंत सरासरी दररोज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. १ मे रोजी जिल्ह्यात मृत्यूचा दर २.४२ होता. तो आता २.४५ वर पोहोचला आहे.

एप्रिल महिन्यातील कोरोनाबाधित : २२५७८

एप्रिल महिन्यातील रुग्णांचे मृत्यू : ४८५

मे महिन्यातील कोरोनाबाधित : ११८३६

मे महिन्यातील एकूण मृत्यू : ३०४