शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

परभणी जिल्ह्यात ९२५ कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:42 IST

जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांकडे वीज वितरण कंपनीची ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरु केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा विधानसभेत केल्यामुळे जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांकडे वीज वितरण कंपनीची ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरु केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा विधानसभेत केल्यामुळे जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांना दिलासा मिळाला आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो. जिल्ह्यात घरगुती, औद्योगिक, लघुदाब, वाणिज्य व कृषी असे जवळपास २ लाख वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना कंपनीच्या वतीने महिन्याकाठी वीज बिल दिले जाते. जिल्ह्यामध्ये ९३ हजार कृषीपंपधारकांची संख्या आहे. या कृषीपंपधारकांकडे गेल्या अनेक वर्षांपासून ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र गेल्या वर्षांमध्ये दुष्काळ व अवकाळी पावसाचा सामना करणाऱ्या शेतकºयांना या वर्षातील रबी व खरीप हंगामातून उत्पन्न हाती लागले नाही. त्यामुुळे उत्पन्न खर्च काढू न शकलेल्या शेतकºयांकडे महावितरणचे विद्युत बिल भरण्यासाठी पैसा उपलब्ध नव्हता. त्यामुळे या कृषीपंपधारकांकडे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत गेला.यावर्षी खरीप हंगामात कापूस बहरला. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. परंतु, पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने कापसावर हल्ला चढविल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे याहीवर्षीच्या खरीप हंगामात पिकांवर केलेला खर्च निघाला नाही. त्यामुळे कृषीपंपधारक आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यातच महावितरणनेही १ मार्चपासून जिल्ह्यात वेगवेगळे पथक स्थापन करुन कृषीपंपधारकांकडे असलेली थकबाकी वसुली सुरु केली होती. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे टाकले. दरम्यान या वसुली मोहिमेस स्थगिती द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत लावून धरली. त्यानंतर या मागणीचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कृषीपंपधारकांच्या थकित वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची अशी घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांना या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे.वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेशकृषीपंपधारकांकडे असलेल्या वीज बिल वसुलीस स्थगिती देऊन कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा आदेश वीज वितरण कंपनीला देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. त्या पाणीपुरवठ्यांची थकबाकी सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कृषीपंपधारकांबरोबरच ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेलाही जीवदान मिळाले आहे.असे आहेत विभागनिहाय कृषीपंपाचे ग्राहकपरभणी ग्रामीण १६ हजार ९७५, परभणी शहर ६५१, पाथरी १० हजार १८३, पूर्णा १० हजार ६०६, गंगाखेड ८ हजार ८३४, जिंतूर १७ हजार २२४, मानवत ७ हजार ९३५, पालम ५ हजार ९५२, सेलू १० हजार ४१४, सोनपेठ ४ हजार ७०२, एकूण ९३ हजार ४७६.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र