शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

परभणी जिल्ह्यात ९२५ कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:42 IST

जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांकडे वीज वितरण कंपनीची ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरु केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा विधानसभेत केल्यामुळे जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांकडे वीज वितरण कंपनीची ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरु केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा विधानसभेत केल्यामुळे जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांना दिलासा मिळाला आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो. जिल्ह्यात घरगुती, औद्योगिक, लघुदाब, वाणिज्य व कृषी असे जवळपास २ लाख वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना कंपनीच्या वतीने महिन्याकाठी वीज बिल दिले जाते. जिल्ह्यामध्ये ९३ हजार कृषीपंपधारकांची संख्या आहे. या कृषीपंपधारकांकडे गेल्या अनेक वर्षांपासून ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र गेल्या वर्षांमध्ये दुष्काळ व अवकाळी पावसाचा सामना करणाऱ्या शेतकºयांना या वर्षातील रबी व खरीप हंगामातून उत्पन्न हाती लागले नाही. त्यामुुळे उत्पन्न खर्च काढू न शकलेल्या शेतकºयांकडे महावितरणचे विद्युत बिल भरण्यासाठी पैसा उपलब्ध नव्हता. त्यामुळे या कृषीपंपधारकांकडे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत गेला.यावर्षी खरीप हंगामात कापूस बहरला. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. परंतु, पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने कापसावर हल्ला चढविल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे याहीवर्षीच्या खरीप हंगामात पिकांवर केलेला खर्च निघाला नाही. त्यामुळे कृषीपंपधारक आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यातच महावितरणनेही १ मार्चपासून जिल्ह्यात वेगवेगळे पथक स्थापन करुन कृषीपंपधारकांकडे असलेली थकबाकी वसुली सुरु केली होती. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे टाकले. दरम्यान या वसुली मोहिमेस स्थगिती द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत लावून धरली. त्यानंतर या मागणीचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कृषीपंपधारकांच्या थकित वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची अशी घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांना या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे.वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेशकृषीपंपधारकांकडे असलेल्या वीज बिल वसुलीस स्थगिती देऊन कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा आदेश वीज वितरण कंपनीला देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. त्या पाणीपुरवठ्यांची थकबाकी सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कृषीपंपधारकांबरोबरच ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेलाही जीवदान मिळाले आहे.असे आहेत विभागनिहाय कृषीपंपाचे ग्राहकपरभणी ग्रामीण १६ हजार ९७५, परभणी शहर ६५१, पाथरी १० हजार १८३, पूर्णा १० हजार ६०६, गंगाखेड ८ हजार ८३४, जिंतूर १७ हजार २२४, मानवत ७ हजार ९३५, पालम ५ हजार ९५२, सेलू १० हजार ४१४, सोनपेठ ४ हजार ७०२, एकूण ९३ हजार ४७६.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र