शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर-जरांगे फॅक्टरचा परभणीत महाविकास आघाडीलाच बसणार सर्वाधिक तडाखा

By ज्ञानेश्वर भाले | Updated: March 28, 2024 19:39 IST

लोकसभा निवडणुकीची रणनीती: परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारपासून (दि. २८) नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरूवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल.

परभणी : जिल्ह्यासह राज्याचे राजकीय गणित दिवसागणिक बदलत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात नेमकं कोण कुणाच्या विरोधात उभे राहते, याचा अंदाज बांधला जात नसल्याची स्थिती आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-विर्तकांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांनी जर लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचे निश्चित केल्यास याचा मोठा प्रभाव इतर राजकीय पक्षांवर पडू शकतो. राजकीयदृष्ट्या याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच बसण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मधील परभणी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जवळपास दीड लाख मते घेतली होती. त्यामुळे जरांगे पाटलांनी जर वंचितसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले तर दोन्ही नेत्यांचे अस्तित्व नजरेआड करता येणार नाही.

परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारपासून (दि. २८) नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरूवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल. मात्र, अद्यापही निवडणूक रिंगणात कोण कुणाविरुद्ध असणार, याबाबत संभ्रम असल्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात अद्यापही रंगत आलेली नाही. बुधवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा झाल्याने एका बाजूने अधिकृतरीत्या संजय जाधव हे उमेदवार म्हणून पुढे आले. मात्र, महायुतीचे अद्यापही त्रांगडेच असल्यामुळे नेमकी ही जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर तर्कवितर्क लावले जात आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. परंतु, महायुतीने अद्यापही आपले पत्ते खुले केले नसल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास आली होती. कारण गत काही निवडणुकींचा विचार करता शिवसेनेविरुद्ध आजपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात होता. मात्र, यावेळी राजकीय गणित बदलल्यामुळे ही जागा नेमकी महायुतीत राष्ट्रवादीला जाते की भाजपकडे यावर तर्कवितर्क लावण्यात येत होते. शेवटी राष्ट्रवादी अधिक आग्रही असल्यामुळे परभणीची जागा त्यांनाच जाईल, असे वाटत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी महायुतीत उडी घेतल्यामुळे पुन्हा संभ्रम वाढला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत दीड लाख मतेगत लोकसभा (२०१९) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांना तब्बल एक लाख ४९ हजार ९४६ मते पडली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्यात प्रभाव असल्याचे संबंधित निवडणुकीत पुढे आले होते. वंचितमुळे मतांचे विभाजन झाल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा अंदाज आजही बांधला जात आहे.

एकत्र निवडणूक लढण्यास मतांची विभागणीवंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलन नेते मनाेज जरांगे पाटील यांनी जर लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणामी परभणीसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात दिसून येईल. कारण जातीय समीकरण न पाहता गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभेच्या रिंगणात जवळपास दीड लाखांच्या मतांचा टप्पा गाठला होता. यात वंचितला जर मनोज जरांगे पाटलांची साथ लाभल्यास मतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच अधिक बसणार असल्याची स्थिती आहे.

आंदोलनामुळे एकवटला समाजमराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील गत काही महिन्यांपासून लढत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा प्रभाव निवडणूक काळात कमी लेखता येणार आहे. हजारोंच्या संख्येने जरांगे पाटलांच्या सभेला जिल्हानिहाय मराठा समाजबांधवांची गर्दी दिसून येत होती. लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी मतदारसंघनिहाय एका उमेदवाराची शिफारस करण्याचे निर्देश दिले असून, ३० मार्चनंतर त्यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात ते कुठला निर्णय घेणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील