शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:14 IST

. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने एकीकडे येलदरी, निम्न दुधना या प्रकल्पांनी साथ सोडली असताना दुसरीकडे मिर्झापूर सारख्या छोट्याशा गावात घेतलेल्या तब्बल ६० तळ्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार दिला. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे. शेततळ्यांच्या उभारणीतून मिर्झापूरकरांनी इतर गावकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.

सिंचनाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना मिर्झापूर गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात शेततळे घेऊन पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली. या गावातील भास्कर प्रल्हादराव चट्टे आणि अच्युत रावसाहेब चट्टे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी २०१७ मध्ये  सर्वप्रथम पाच शेततळी घेतली. २०१७ च्या पावसाळी हंगामात शेततळ्यामध्ये पाणी जमा झाले. त्यानंतर रबी हंगामात पावसाने ताण दिला. इतर ठिकाणी दुष्काळामुळे पिके हाती आली नाहीत; परंतु, शेततळ्यामुळे शाश्वत पाणीसाठा निर्माण झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी इ. पिके बऱ्यापैकी निघाली.

शेततळ्यामुळे मिळालेला हा फायदा पाहून गावातून शेततळे घेण्यासाठी पुढाकार सुरु झाला. बघता बघता २०१८ च्या हंगामात या गावात ४२ शेततळ्यांची उभारणी तर २०१९ मध्ये १३ शेततळी बांधण्यात आली. सद्यस्थितीला ६० शेततळी या गावात निर्माण झाली आहेत. या शेततळ्यांमुळे परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भूजलपातळी वाढल्याने विहिरींनाही पाणी उपलब्ध झाले आहे. सुमारे ७०० हेक्टरचे हे शिवार असून शेततळ्यामुळे या गावच्या पीक पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी सोयाबीन, कापूस ही कोरडवाहू पिके घेतली जात होती. आता मात्र हळद, पपई, ऊस ही बागायती पिके वाढली आहेत. शाश्वत पाणीसाठ्यावर सोपान पालवे यांनी ३ एकरांत, बबनराव चट्टे यांनी ४ एकरांत हळदीचे पीक घेतले आहे. तर पप्पू जाधव, विकास जाधव हे शेतकरी पपईचे उत्पादन घेत आहेत. याकामी कृषी विभागातील कृषी सहायक बी.एस. शिंदे, मंडळ अधिकारी बनकर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे आदींनी ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढली आहे. 

मत्स्य व्यवसायाचे नियोजनमागेल त्याला शेततळे या योजनेतून मिर्झापूर येथे ६० शेततळ्यांची उभारणी  झाली असून आणखी १२ शेततळी प्रस्तावित आहेत. ही शेततळी साखळी पद्धतीने उभारण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. सद्यस्थितीला गावातील ७ ते ८ शेततळ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी काळभैरवनाथ शेततळीधारक शेतकरी महासंघाची स्थापना केली असून या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनावरांसाठी पाणी राखीव मिर्झापूर गावात उभारलेल्या शेततळ्यांपैकी दोन शेततळ्यांमधील पाणीसाठा केवळ जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चाऱ्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

मिर्झापूर शिवारात शेततळे घेतल्याने रबी हंगामातील पिकांसाठी पाणी मिळाले. पावसाळा संपल्यानंतर निर्माण होणारा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून जाणवत नाही. त्यामुळे रबी हंगामात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले नसले तरी जनावरांचा चारा आणि सरासरी पीक उत्पादन घेता आले.-अच्युत चट्टे, शेतकरी

दोन वर्षांपूर्वी २० बाय २५ बाय ३ आकाराचे शेततळे शेतात घेतले. तसेच संपूर्ण शेतातील पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात सोडले. त्याचा भरपूर फायदा शेतीला झाला. दुष्काळातही पिकाचे उत्पादन घेता आले. - भास्कर चट्टे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळparabhaniपरभणी