शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:14 IST

. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने एकीकडे येलदरी, निम्न दुधना या प्रकल्पांनी साथ सोडली असताना दुसरीकडे मिर्झापूर सारख्या छोट्याशा गावात घेतलेल्या तब्बल ६० तळ्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार दिला. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे. शेततळ्यांच्या उभारणीतून मिर्झापूरकरांनी इतर गावकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.

सिंचनाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना मिर्झापूर गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात शेततळे घेऊन पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली. या गावातील भास्कर प्रल्हादराव चट्टे आणि अच्युत रावसाहेब चट्टे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी २०१७ मध्ये  सर्वप्रथम पाच शेततळी घेतली. २०१७ च्या पावसाळी हंगामात शेततळ्यामध्ये पाणी जमा झाले. त्यानंतर रबी हंगामात पावसाने ताण दिला. इतर ठिकाणी दुष्काळामुळे पिके हाती आली नाहीत; परंतु, शेततळ्यामुळे शाश्वत पाणीसाठा निर्माण झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी इ. पिके बऱ्यापैकी निघाली.

शेततळ्यामुळे मिळालेला हा फायदा पाहून गावातून शेततळे घेण्यासाठी पुढाकार सुरु झाला. बघता बघता २०१८ च्या हंगामात या गावात ४२ शेततळ्यांची उभारणी तर २०१९ मध्ये १३ शेततळी बांधण्यात आली. सद्यस्थितीला ६० शेततळी या गावात निर्माण झाली आहेत. या शेततळ्यांमुळे परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भूजलपातळी वाढल्याने विहिरींनाही पाणी उपलब्ध झाले आहे. सुमारे ७०० हेक्टरचे हे शिवार असून शेततळ्यामुळे या गावच्या पीक पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी सोयाबीन, कापूस ही कोरडवाहू पिके घेतली जात होती. आता मात्र हळद, पपई, ऊस ही बागायती पिके वाढली आहेत. शाश्वत पाणीसाठ्यावर सोपान पालवे यांनी ३ एकरांत, बबनराव चट्टे यांनी ४ एकरांत हळदीचे पीक घेतले आहे. तर पप्पू जाधव, विकास जाधव हे शेतकरी पपईचे उत्पादन घेत आहेत. याकामी कृषी विभागातील कृषी सहायक बी.एस. शिंदे, मंडळ अधिकारी बनकर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे आदींनी ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढली आहे. 

मत्स्य व्यवसायाचे नियोजनमागेल त्याला शेततळे या योजनेतून मिर्झापूर येथे ६० शेततळ्यांची उभारणी  झाली असून आणखी १२ शेततळी प्रस्तावित आहेत. ही शेततळी साखळी पद्धतीने उभारण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. सद्यस्थितीला गावातील ७ ते ८ शेततळ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी काळभैरवनाथ शेततळीधारक शेतकरी महासंघाची स्थापना केली असून या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनावरांसाठी पाणी राखीव मिर्झापूर गावात उभारलेल्या शेततळ्यांपैकी दोन शेततळ्यांमधील पाणीसाठा केवळ जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चाऱ्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

मिर्झापूर शिवारात शेततळे घेतल्याने रबी हंगामातील पिकांसाठी पाणी मिळाले. पावसाळा संपल्यानंतर निर्माण होणारा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून जाणवत नाही. त्यामुळे रबी हंगामात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले नसले तरी जनावरांचा चारा आणि सरासरी पीक उत्पादन घेता आले.-अच्युत चट्टे, शेतकरी

दोन वर्षांपूर्वी २० बाय २५ बाय ३ आकाराचे शेततळे शेतात घेतले. तसेच संपूर्ण शेतातील पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात सोडले. त्याचा भरपूर फायदा शेतीला झाला. दुष्काळातही पिकाचे उत्पादन घेता आले. - भास्कर चट्टे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळparabhaniपरभणी