शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:14 IST

. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने एकीकडे येलदरी, निम्न दुधना या प्रकल्पांनी साथ सोडली असताना दुसरीकडे मिर्झापूर सारख्या छोट्याशा गावात घेतलेल्या तब्बल ६० तळ्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार दिला. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे. शेततळ्यांच्या उभारणीतून मिर्झापूरकरांनी इतर गावकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.

सिंचनाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना मिर्झापूर गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात शेततळे घेऊन पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली. या गावातील भास्कर प्रल्हादराव चट्टे आणि अच्युत रावसाहेब चट्टे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी २०१७ मध्ये  सर्वप्रथम पाच शेततळी घेतली. २०१७ च्या पावसाळी हंगामात शेततळ्यामध्ये पाणी जमा झाले. त्यानंतर रबी हंगामात पावसाने ताण दिला. इतर ठिकाणी दुष्काळामुळे पिके हाती आली नाहीत; परंतु, शेततळ्यामुळे शाश्वत पाणीसाठा निर्माण झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी इ. पिके बऱ्यापैकी निघाली.

शेततळ्यामुळे मिळालेला हा फायदा पाहून गावातून शेततळे घेण्यासाठी पुढाकार सुरु झाला. बघता बघता २०१८ च्या हंगामात या गावात ४२ शेततळ्यांची उभारणी तर २०१९ मध्ये १३ शेततळी बांधण्यात आली. सद्यस्थितीला ६० शेततळी या गावात निर्माण झाली आहेत. या शेततळ्यांमुळे परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भूजलपातळी वाढल्याने विहिरींनाही पाणी उपलब्ध झाले आहे. सुमारे ७०० हेक्टरचे हे शिवार असून शेततळ्यामुळे या गावच्या पीक पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी सोयाबीन, कापूस ही कोरडवाहू पिके घेतली जात होती. आता मात्र हळद, पपई, ऊस ही बागायती पिके वाढली आहेत. शाश्वत पाणीसाठ्यावर सोपान पालवे यांनी ३ एकरांत, बबनराव चट्टे यांनी ४ एकरांत हळदीचे पीक घेतले आहे. तर पप्पू जाधव, विकास जाधव हे शेतकरी पपईचे उत्पादन घेत आहेत. याकामी कृषी विभागातील कृषी सहायक बी.एस. शिंदे, मंडळ अधिकारी बनकर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे आदींनी ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढली आहे. 

मत्स्य व्यवसायाचे नियोजनमागेल त्याला शेततळे या योजनेतून मिर्झापूर येथे ६० शेततळ्यांची उभारणी  झाली असून आणखी १२ शेततळी प्रस्तावित आहेत. ही शेततळी साखळी पद्धतीने उभारण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. सद्यस्थितीला गावातील ७ ते ८ शेततळ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी काळभैरवनाथ शेततळीधारक शेतकरी महासंघाची स्थापना केली असून या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनावरांसाठी पाणी राखीव मिर्झापूर गावात उभारलेल्या शेततळ्यांपैकी दोन शेततळ्यांमधील पाणीसाठा केवळ जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चाऱ्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

मिर्झापूर शिवारात शेततळे घेतल्याने रबी हंगामातील पिकांसाठी पाणी मिळाले. पावसाळा संपल्यानंतर निर्माण होणारा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून जाणवत नाही. त्यामुळे रबी हंगामात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले नसले तरी जनावरांचा चारा आणि सरासरी पीक उत्पादन घेता आले.-अच्युत चट्टे, शेतकरी

दोन वर्षांपूर्वी २० बाय २५ बाय ३ आकाराचे शेततळे शेतात घेतले. तसेच संपूर्ण शेतातील पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात सोडले. त्याचा भरपूर फायदा शेतीला झाला. दुष्काळातही पिकाचे उत्पादन घेता आले. - भास्कर चट्टे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळparabhaniपरभणी