शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आदिलाबाद-पूूर्णा (परभणी) रेल्वे डब्ब्याचा दरवाजा तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:51 AM

दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा: दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़अदिलाबाद ते पूर्णा ही रेल्वे गाडी नांदेड येथून ११ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास निघाली होती़ यावेळी गाडीच्या एका डब्ब्याचा दरवाजा निखळून पडलेला आढळून आला़ याच वेळी नांदेड ते पूर्णा दरम्यान वादळी वारे वाहत होते़ काही भागात पाऊसही झाला होता़ वादळी वाऱ्यामुळेच दरवाजा निखळून पडला असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती़ परंतु, प्रत्यक्ष पाहणी केली असता सांध्यातूनच दरवाजा निखळून पडल्याचे दिसून येत होते़ हा दरवाजा केव्हा निखळून पडला याची माहिती मिळू शकली नाही़रेल्वे सुरू असतांना दरवाजा पडला असता तर प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला असता अशी चर्चा प्रवाशांमधून ऐकवायास मिळत होती़ नांदेड विभागातील एक्सप्रेस गाड्यांसह पॅसेंजर गाड्यांना जुने व मोडकळीस आलेले डब्बे वापरण्यात येत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासी