शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

ांविरूद्ध कारवाई करण्यात आली.शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:51 IST

वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने शहरात मागील दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे़ मात्र वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाºया कारवाया लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने शहरात मागील दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे़ मात्र वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाºया कारवाया लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याचे दिसत आहे़अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असताना कानाडोळा केला जातो आणि ठराविक ठिकाणी मात्र शिस्तीचा बडगा उगारत दंड वसूल केला जात असल्याने वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून कोलमडली आहे़ जागोजागी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते़ त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे, छोटे मोठे अपघात होणे यासारख्या घटना घडतात़ या विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेने शहरात मोहीम सुरू केली़वाहतुकीला अडथळा ठरणारी दुचाकी वाहने थेट उचलून कारवाई केली जाऊ लागली़ सुरुवातीला या मोहिमेचे स्वागतही झाले; परंतु, ही मोहीम राबवित असताना वाहतूक शाखेचे कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचे समोर येत आह़े़ शहरात जागोजागी वाहने लावली जातात़ वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने हातगाडे लावलेले आहेत़ परंतु, याविरूद्ध कारवाई होत नाही़ विशेष म्हणजे, शहरात वास्तव्याला असलेल्या वाहनधारकाने नियम मोडला तर त्याकडे कानाडोळाही केला जातो़; परंतु, ग्रामीण भागातील वाहनधारकांवर मात्र कडक कारवाई केली जाते़ हा दुजाभाव दररोज जागोजागी दिसत आहे़ ग्रामीण भागातून दररोज अनेक युवक शहरात कामानिमित्त येतात़ अशा वाहनधारकांना कडक नियम लावले जातात़ वाहनधारकाच्या नजरचुकीने नियमांचे उल्लंघन झाले असताना त्या वाहनधारकाला सुरुवातीला समज देणे आवश्यक असते़; परंतु, असे न करता थेट पावती फाडून दंड आकारला जात आहे़ शहरातील काही मोजक्याच ठिकाणी ही कारवाई केली जात असून, इतर ठिकाणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे़ या प्रकारामुळे वाहतूक शाखेच्या कारवाईविषयी वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे़एकाच ठिकाणी पोलिसांचा गराडाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दररोज मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित असतात़ एका पॉर्इंटवर दोन कर्मचारी पुरेसे असताना ५ ते ६ पोलीस कर्मचाºयांसह अनेक वेळा पोलीस अधिकारीही या ठिकाणी उपस्थित राहून कारवाई करीत आहेत़ त्यामुळे एवढ्या कर्मचाºयांची एकाच ठिकाणी काय आवश्यकता? असा सवाल उपस्थित होत आहे़ अनेक भागांत तर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थितही नसतात़ रेल्वेस्थानक परिसर, नारायण चाळ, उड्डाणपूल या ठिकाणी पोलीस कर्मचाºयांची आवश्यकता आहे़ वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी या भागात वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे़ परंतु, वाहूतक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे येत नाहीत़ मात्र दंड आकारण्यासाठी पोलीस कर्मचारी नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसत आहे़टोर्इंग व्हॅन कारवाईबाबतही संतापवाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशाने वाहतूक शाखेन टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने वाहने उचलून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे़ प्रत्यक्षात एखादे वाहन रस्त्यात उभे असेल तर त्या वाहनाचा पंचासमक्ष पंचनामा करूनच ते वाहन ताब्यात घेणे अपेक्षित आहे़ परंतु, सर्रास वाहने उचलून कारवाई केली जात आहे़ शहरामध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही, अशी ओरड झाल्यानंतर महापालिकेने काही भागात पार्किंगचे पट्टे ओढले़ परंतु, या पार्किंगची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेची असताना ती मात्र झटकली जात आहे़ रस्त्यात उभी असणारी वाहने पार्किंगमध्ये नेवून उभी केली तर वाहतुकीला शिस्त लागू शकते़ शिवाय अनेक ठिकाणी पार्किंगच्या स्थळीच हातगाडे, छोटे व्यावसायिक थांबतात़ ही जागा पार्किगसाठी मोकळी करणे अपेक्षित आह़े़ त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे़शहराबाहेरही होते कारवाईशहरामध्ये वाहतूक शाखेने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे़ परंतु, शहराबाहेरही वाहतूक शाखेतील काही कर्मचारी वाहनधारकांकडून दंड वसूल करीत आहेत़ गुरुवार हा जनावरांच्या बाजाराच्या दिवशी जनावरांची वाहतूक करणाºया वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो़४तसेच शहरात दाखल होण्यापूर्वीच वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याच्या उद्देशाने वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराबाहेरही थांबत असल्याचे दिसत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीtraffic policeवाहतूक पोलीस