शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात झाली ६६००० मे़टन खत विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:19 PM

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, कापूस व तूर या पिकांसाठी ६६ हजार ३०० मे़ टन खत खरेदी केले

परभणी : खरीप हंगामात पिकांना खताची मात्रा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ८५ हजार ९३९ मे़ टन खताचा साठा करून ठेवला होता़ त्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, कापूस व तूर या पिकांसाठी ६६ हजार ३०० मे़ टन खत खरेदी केले आहे़ त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी कृषी विभागाकडे १९ हजार ६३९ मे़ टन खत शिल्लक आहे़ 

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिकांची दरवर्षी जून महिन्यात पेरणी केली जाते़ या पिकांना लागणाऱ्या औषधी व खतांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून संबंधित विभागाकडे नोंदविण्यात आली़ त्यानुसार जिल्ह्याला खताचा साठा उपलब्ध होतो़  यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती़ यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन पिकास प्राधान्य देऊन अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली़ या पिकांना खताची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून खरीप हंगामासाठी १ लाख ५१ हजार १९० मे़ टन खताची मागणी वरिष्ठस्तरावर नोंदविली होती़ 

त्यापैकी ८९ हजार ३६० मे़ टन खत मंजूर झाले़ त्यातून ५० हजार ७६० मे़ टन खत जिल्ह्याला वितरित झाला़ ३१ मार्च २०१८ पर्यंत कृषी विभागाकडे गत रबी हंगामातील ३५ हजार १७९ मे़टन खत उपलब्ध होता़ त्यामुळे कृषी विभागाकडे ८५ हजार ९३९ मे़ टन खताचा साठा झाला़ त्यातील खरीप हंगामात ६६ हजार ३०० मे़ टन खत विक्री झाला़ त्यामुळे कृषी विभागाकडे सध्या रबी हंगामासाठी १९ हजार ६३९ मे़ टन खत उपलब्ध आहे़ विशेष म्हणजे कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार खत जिल्ह्याला उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची कमरता भासली नाही़ 

असा उपलब्ध झाला खतसाठाजिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर खताची मागणी नोंदविण्यात आली होती़ त्यानुसार युरिया १८ हजार ९६० मे़टन, डीएपी ८ हजार ८०० मे़टन, एमओपी ३ हजार १०० मे़टन, एनपीके १७ हजार ४०० मे़टन, एसएसपी २ हजार ५०० मे़टन असा एकूण ५० हजार ७६० मे़ टऩ खताचा जिल्ह्याला खरीप हंगामासाठी पुरवठा झाला होता़ 

रबी हंगामाचीही चिंता मिटलीयावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडे ८५ हजार ९३९ मे़टन खताचा साठा उपलब्ध झाला़ त्यातील ६६ हजार ३०० मे़ टन खताची खरीप हंगामात विक्री झाली़  १० सप्टेंबर २०१८ पर्यंत कृषी विभागाकडे १९ हजार ६३९ मे़ टन खत शिल्लक आहे़ तसेच कृषी विभागही रब्बी हंगामासाठी वरिष्ठ स्तरावर जिल्ह्याला खताचा अधिक साठा उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी नोंदविणार आहे़ त्यामुळे रबी हंगामातही शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र