शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परभणी- हिंगोली विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:44 IST

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ५०१ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना-भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे.परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत मतदान मंदावलेलेच होते.

परभणी :  परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ५०१ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तब्बल ९९.६० टक्के मतदारांनी मतदान केल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना-भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत मतदान मंदावलेलेच होते. दुपारी २ वाजेनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. सायंकाळी ४ वाजता दोन्ही जिल्ह्यातील सातही केंद्रांवर संपन्न झाले. निवडणूक विभागाने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार ५०१ मतदारांपैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोली येथील १०९ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. येथे २ मतदारांनी मतदान केले नाही. उर्वरित सहाही मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. 

दोन्ही उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून गुरुवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने आपल्याकडे असलेली परभणीची जागा कायम ठेवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. त्या दृष्टीकोनातून प्रचारही केला. दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीने अतिशय शिताफीने रणनिती आखत प्रचार केला. त्यामुळे निकाल काय लागतो, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस