शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

परभणी जिल्ह्यात खरिपाच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:40 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने चालू वर्षातील खरीप हंगामात ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (८७.३६ टक्के) पेरणी पूर्ण करण्यात असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रारंभीच्या अल्प पावसावर पेरणी केलेल्या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने चालू वर्षातील खरीप हंगामात ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (८७.३६ टक्के) पेरणी पूर्ण करण्यात असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रारंभीच्या अल्प पावसावर पेरणी केलेल्या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.२०१८-१९ या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर हे तीन्ही महिने कोरडेठाक गेले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली होती. त्या शेतकºयांचे पीक जागेवरच करपून गेले.उसणवारी व बँकांच्या दारामध्ये उभे राहून मिळालेल्या पैशांतून शेतकºयांनी बी-बियाणे व कीटकनाशकांची खरेदी केली होती; परंतु, कोणतेच पीक हाती न लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीच्या दुष्काळाला मागे सारुन शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातून पेरणी केलेल्या पिकातून भरपूर उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने तयारी केली.मृग व आर्द्रा हे दोन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांच्या चिंतेत आणखीच भर पडली; परंतु, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या सर्वदूर पावसावर शेतकºयांनी पेरणीस प्रारंभ केला. १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण केली आहे. म्हणजेच एकूण पेरणीच्या ८७.३६ टक्के पेरणी झाली आहे. मात्र पावसाने पुन्हा एकदा या हंगामात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकºयांची पिके जागेवरच ऊन धरत आहेत.येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला तरच शेतकºयांची पिके तरणार आहेत; अन्यथा शेतकºयांना याही वर्षी खरीप हंगामातील उत्पादनावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.१ लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबिनचा पेरा४जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर भूईमुग, सूर्यफुल व कापूस ही पिके घेतली जातात. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या अहवालानुसार १६ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २३ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे.४उडदाची ६ हजार ४१७ हेक्टरवर तर तुरीची ४० हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर तर सर्वाधिक १ लाख ९२ हजार ६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर १ लाख ८६ हजार २१९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली आहे.सोयाबीन : कापसावर किडीचा प्रादुर्भाव४जिल्ह्यात अल्प पावसावर प्रारंभी पेरणी केलेली पिके बºयापैकी आली आहेत. पावसाचे उघडीप दिल्याने कापूस व सोयाबीन पिकावर पैसा व करडे भुंगे या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडी कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.४पैसा ही कीड कपाशीचे सर्वाधिक नुकसान करते. त्यामुळे शेतात व बांधावरील पैसा कीड हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. शेत तृण विरहित ठेवावे. तसेच बांधावरील तृणाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केले आहे.४ तसेच करडे भुंगे ही कीड साधारणत: कमी महत्त्वाची असून ती नियमितपणे पिकांवर अत्यल्प प्रमाणात आढळून येते. परंतु, कधीकधी या किडीचा उपद्रव अधिक प्रमाणात दिसून येतो. ही कीड पानांना गोलाकार छिद्र पाडून कोवळी रोपे खाऊन टाकते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल २५ मि.लिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी, असे आवाहन वनामकृविचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.पी.आर. झंवर व सहायक प्रा. डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे....तर दुबार पेरणीचे संकट४पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही एकही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जमिनीत ओलावा टिकून नाही.४जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या बहुतांश ठिकाणी पिकांनी ऊन धरले आहे. हीच परिस्थिती आणखी आठ दिवस राहिली.४ दमदार पाऊस झाला नाही तर शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. त्यातच पेरणीचा कालावधी संपलेला असल्याने दुबार पेरणी होते की नाही, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस