शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ८० शाळांना लागणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

इंग्रजी शाळांची संख्या वाढल्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांमधील उपस्थितीवर गेल्या काही वर्षांपासून जाणवत आहे. २०१८ मध्ये राज्य शासनाने १० ...

इंग्रजी शाळांची संख्या वाढल्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांमधील उपस्थितीवर गेल्या काही वर्षांपासून जाणवत आहे. २०१८ मध्ये राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परभणी जिल्ह्यात अशा ८ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळपासच्या इतरत्र शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. त्यावेळी बरीच ओरड झाली होती. आता राज्य शासनाने २० पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या शाळा लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यात जिल्हा परषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एकूण ८० शाळा आहेत. त्यामध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एकूण १३ तर ११ ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या ६७ शाळा आहेत. असा निर्णय झाला तर या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतरत्र स्थलांतरित करावे लागणार आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकही चलबिचल झाले आहेत.

खासगी ४३ शाळाही कमी पटसंख्येच्या

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा जिल्हा परिषद शाळांबाबतचाच विचार सध्या शासन स्तरावर विचाराधीन आहे. असे असले तरी जिल्ह्यात ४३ खासगी शाळांमध्येही २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये २ शाळा या अनुदानित असून उर्वरित ४१ शाळा विनाअनुदानित आहेत. त्यामुळे या शाळांचे काय? होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षकांचे काय?

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या शाळा लगतच्या शाळेत समायोजित करण्याचा निर्णय झाला तर या शाळांमधील शिक्षकांची इतर शाळांमध्ये बदली करण्यात येते. यापूर्वी जिल्ह्यातील ज्या ८ शाळा बंद झाल्या होत्या, शाळेतील शिक्षकांच्याही बदल्या झाल्या होत्या.

विद्यार्थ्यांचे काय ?

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत शासन स्तरावर निर्णय झाला तर या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळेत स्थलांतरित केले जाईल. जवळपासच्या शाळेचे अंतर अधिक असेल तर त्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांशिवाय पर्याय राहणार नाही.

शासन निर्णय अद्याप आलेला नाही

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा किंवा इतरत्र स्थलांतरित करण्याचा शासन निर्णय अद्याप परभणी जिल्हा परिषदेला मिळालेला नाही. काही वर्षांपूर्वी १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मात्र झाला होता.

-डाॅ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी, परभणी