शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत 76 शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:43 IST

कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपरभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकऱ्यांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित करण्यात आल्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी

परभणी :  निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकऱ्यांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी मागील एक वर्षापासून हे शेतकरी शासन दरबारी निवेदने, आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. मात्र त्यांच्या मागणीवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकऱ्यांनी १ जून रोजी आत्मदहनाचा इाशारा दिला होता. 

या शेतकऱ्यांच्या इशाऱ्या प्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. या दोन गावातील जमीन संपादित झालेले गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकऱ्यांनी इशारा दिल्या प्रमाणे शुक्रवारी १२ वाजेच्या सुमारास हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. तेव्हा जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेटवर या शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांकडून अडविण्यात आले. त्यांच्या जवळ असलेले साहित्य जप्त करुन त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 

सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त संबर व पिंपळगाव टोंग येथील ७६ शेतकऱ्यांनी वाढीव मावेजा मिळावा, यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरातील जायकवाडी वसाहत व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे हे शेतकरी कार्यालयापर्यंत पोहचू शकले नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी