शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

गंगाखेड तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीचा पाणीपुरवठा झाला बंद; थकबाकीमुळे महावितरणने वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 6:48 PM

गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे.

परभणी : गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

महावितरणचे तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. अनेक महिन्यांपासून वीज बिलाचा भरणा केला नसल्याने महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. त्यामुळे महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील उंडेगाव, धारासूर, महातपुरी, पिंपळदरी, खळी, सुप्पा, कुंडगीरवाडी, चिंचटाकळी, मरडसगाव, राणीसावरगाव, लिंबेवाडी, रुमणा जवळा, डोंगरगाव, डोंगरजवळा, डोंगर पिंपळा, गौळवाडी, दामपुरी आदी ४७ गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या गावातील पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत़ त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़

इतर ग्राहकांकडेही थकले वीज बिलतालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीकडे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच नगर परिषदेकडे पथदिव्याची तसेच, कृषी ग्राहक, औद्योगिक व घरगुती विजेचा वापर करणार्‍या ग्राहकांकडेही थकबाकी आहे. महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली  आहे. ही कारवाई उपविभागीय अभियंता साहेबराव सोनवणे, सहाय्यक अभियंता एन.सी. भसारकर, एस.यु.गिरी, पी.जी.ढोणे, कनिष्ठ अभियंता धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गाव पातळीवर घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांची वसुली वेळेवर होत नसल्याने वीज बिल भरणा करण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती राणीसावरगावचे सरपंच सोमनाथ कुदमुळे यांनी दिली. 

ग्रा.पं.च्या स्वखर्चातून वीज बिल भरणा करावाग्रामपंचायतस्तरावर पथदिवे, पाणीपुरवठा विभागाच्या वीज बिलाचा भरणा यापूर्वी वित्त आयोगाच्या निधीतून केला जात होता. मात्र यावर शासनाने निर्बंध लावून कृती आराड्यानुसार वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच ग्रा.पं.कडे वीज बिलाची रक्कम थकली आहे. ही रक्कम ग्रा.पं.च्या स्व उत्पन्नातून भरणा करावी, अशा सूचना ग्रामसेवकामार्फत दिल्या आहेत. - टी.बी. शिंदे, गटविकास अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी