शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तीन वर्षांत ४ हजार क्षयरुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST

परभणी : मागच्या तीन वर्षांपासून क्षयरुग्णांची शोध मोहीम सुरू असून, या काळात ५ हजार २१ रुग्णांची नोंद करण्यात आली. ...

परभणी : मागच्या तीन वर्षांपासून क्षयरुग्णांची शोध मोहीम सुरू असून, या काळात ५ हजार २१ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी ४ हजार २८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

येथील जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्षयरोगाचे लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांवर उपचार करून त्यांना क्षयरोगमुक्त केले जाते. मागच्या तीन वर्षांत ४ हजार २८ रुग्णांनी क्षय रोगावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ६५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. योग्य निदान व योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होतात. हे मृत्यू टाळण्यासाठी क्षयरोगाची लक्षणे आढळताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

क्षयरोग हा फुप्फुसाव्यतिरिक्त लसिका ग्रंथी, आतडे, हाड, सांधे, मेंदू आवरण, गर्भाशयाच्या नलिका, डोळ्याच्या आतील भाग, कातडी यांना होऊ शकतो. जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये ५ हजार २१ रुग्णांना क्षयरोगाची लक्षणे आढळली. या रुग्णांवर योग्य उपचार झाल्याने ४ हजार २८ रुग्ण क्षयरोगमुक्त झाले आहेत.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असणारा खोकला, ताप, भूक मंदावणे, रात्री येणारा घाम व ताप, वजनामध्ये घट होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेला कातडीखाली न दुखणाऱ्या लसिका ग्रंथी आदी क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केेले आहे.

२०१९ मध्ये नोंद झाले सर्वाधिक रुग्ण

मागील तीन वर्षांच्या काळात क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. २०१९ मध्ये १,९६८ रुग्ण नोंद झाले होते. त्यापैकी १,७८७ रुग्णांनी क्षयरोगावर मात केली. त्याचप्रमाणे २०१८ मध्ये १ हजार ६५३ रुग्णांची नोंद करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात १ हजार ४९४ रुग्ण क्षयरोगमुक्त झाले आहेत. तर २०२० मध्ये १,४०० रुग्ण नोंद झाले असून, त्यातील ९४७ रुग्ण बरे झाले आहेत.