शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:22 IST

ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

परभणी : देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे बंजारा समाज या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा समाज ऐन सणासुदीच्या काळात घरादारापासून दूर राहून ऊसतोडी करतो. गेल्या वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या बांधवांचे कुटुंब सुरळीत चालण्यासाठी त्यांना जीवन विमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे, आश्वासन पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथे सोमवारी गोर सेनेतर्फे ऊसतोड कामगार महामेळावा घेण्यात आला. या प्रसंगी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, कर्नाटक गोरसेनेचे रविकांत बागडी, गोदावरीचे सरपंच नामदेव पवार आदी उपस्थित होते. ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

ऊसतोड कामगारांना आरोग्य, सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्यांच्या हिताचे लवकरच निर्णय घेण्यात येतील. राज्यात बंजारा समाजाच्या मुलांसाठी ८२ निवासी वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतही लवकरच वसतिगृहे सुरू करणार असून, ऊसतोड कामगारांच्या इतरही मागण्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास मंत्री राठोड यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, अरुण चव्हाण समाजबांधवांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी गोर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीparabhaniपरभणी