शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जिंतूर तालुक्यात २१ तलावांतून ३ लाख १० हजार घनमीटर गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:18 IST

 ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देजिंतूर तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे़ जमीन मुरमाड व खडकाळ आहे तालुक्यातील २१ तलावांतील साठलेला गाळ काढण्याच्या कामास गती देण्यात आली आतापर्यंत २१ तलावांतील ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़.

परभणी :  ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे.

जिंतूर तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे़ जमीन मुरमाड व खडकाळ असून, शेती करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत़ तालुक्यात तलावांची संख्याही बऱ्यापैकी असून, या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ परिणामी पाणीसाठ्यामध्ये घट होत आहे़ तलावातील साचलेला गाळ काढून शेतामध्ये टाकल्यास उत्पादनामध्ये भर होईन पाणीसाठ्यामध्येही वाढ होऊ शकते़ त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत तालुक्यातील तलावातील गाळ काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला़ 

गाळ काढण्यासाठी जनजागृती करणाऱ्या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतील साठलेला गाळ काढण्याच्या कामास गती देण्यात आली आहे़ आतापर्यंत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतील ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़. यामध्ये दहेगाव येथील लघुसिंचन विभाग व जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या तलावातून,  पुंगळा, रायखेडा, कवडा, जांभरून, मानमोडी, जांब खु़, जांब बु ़,चिंचोली काळे, साखरतळा, डोंगरतळा, भोगाव देवी, संक्राळा, बामणी, भोसी, वडाळी, यनोली तांडा, मानधनी येथील तलावातील गाळाचा समावेश आहे़ या २१ तलावांतून ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढून ३ हजार १०७ एकरवर हा गाळ टाकण्यात आला आहे़ शेतकऱ्यांचाही याला प्रतीसाद मिळत असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावतील गाळ नेला जात आहे़ 

सध्या हे काम जोमात सुरूच आहे़ त्यामुळे तलावामध्ये पाणीसाठ्यात वाढ होऊन जमीनही कसदार होणार आहे़ याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असून, पिकांना पाणीही उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे तलावतील गाळ आपल्या शेतामध्ये टाकावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे़ 

शासनाकडून मिळणार इंधन खर्चगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाच्या वतीने गाळ काढण्याच्या उपक्रमास जिंतूर तालुक्यात गती आली आहे़ या अंतर्गत काढलेला गाळ लोकसहभागातून शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहेत़ तलावातील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत असून, यासाठी शासनाच्या वतीने एक क्युबिक मीटर (घनमीटर) गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीनचा इंधन खर्च म्हणून ११़९० रुपये निधी देण्यात येत आहे़ त्यामुळे तलावातील जास्तीत जास्त गाळ काढून शेतकऱ्यांनी जमिनी सुपिक बनवाव्यात, असे आवाहन   अनुलोप संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे़ 

पाणीसाठ्यात वाढ होईल गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळ काढण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे शेती सुपिक होवून पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे़ शेतकऱ्यांनी या योजनेतून गाळ काढून आपल्या शेतात टाकावा़ - सुरेश शेजूळ, तहसीलदार,  जिंतूर

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीcollectorतहसीलदार