शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

जिंतूर तालुक्यात २१ तलावांतून ३ लाख १० हजार घनमीटर गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:18 IST

 ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देजिंतूर तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे़ जमीन मुरमाड व खडकाळ आहे तालुक्यातील २१ तलावांतील साठलेला गाळ काढण्याच्या कामास गती देण्यात आली आतापर्यंत २१ तलावांतील ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़.

परभणी :  ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे.

जिंतूर तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे़ जमीन मुरमाड व खडकाळ असून, शेती करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत़ तालुक्यात तलावांची संख्याही बऱ्यापैकी असून, या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ परिणामी पाणीसाठ्यामध्ये घट होत आहे़ तलावातील साचलेला गाळ काढून शेतामध्ये टाकल्यास उत्पादनामध्ये भर होईन पाणीसाठ्यामध्येही वाढ होऊ शकते़ त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत तालुक्यातील तलावातील गाळ काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला़ 

गाळ काढण्यासाठी जनजागृती करणाऱ्या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतील साठलेला गाळ काढण्याच्या कामास गती देण्यात आली आहे़ आतापर्यंत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतील ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़. यामध्ये दहेगाव येथील लघुसिंचन विभाग व जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या तलावातून,  पुंगळा, रायखेडा, कवडा, जांभरून, मानमोडी, जांब खु़, जांब बु ़,चिंचोली काळे, साखरतळा, डोंगरतळा, भोगाव देवी, संक्राळा, बामणी, भोसी, वडाळी, यनोली तांडा, मानधनी येथील तलावातील गाळाचा समावेश आहे़ या २१ तलावांतून ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढून ३ हजार १०७ एकरवर हा गाळ टाकण्यात आला आहे़ शेतकऱ्यांचाही याला प्रतीसाद मिळत असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावतील गाळ नेला जात आहे़ 

सध्या हे काम जोमात सुरूच आहे़ त्यामुळे तलावामध्ये पाणीसाठ्यात वाढ होऊन जमीनही कसदार होणार आहे़ याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असून, पिकांना पाणीही उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे तलावतील गाळ आपल्या शेतामध्ये टाकावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे़ 

शासनाकडून मिळणार इंधन खर्चगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाच्या वतीने गाळ काढण्याच्या उपक्रमास जिंतूर तालुक्यात गती आली आहे़ या अंतर्गत काढलेला गाळ लोकसहभागातून शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहेत़ तलावातील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत असून, यासाठी शासनाच्या वतीने एक क्युबिक मीटर (घनमीटर) गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीनचा इंधन खर्च म्हणून ११़९० रुपये निधी देण्यात येत आहे़ त्यामुळे तलावातील जास्तीत जास्त गाळ काढून शेतकऱ्यांनी जमिनी सुपिक बनवाव्यात, असे आवाहन   अनुलोप संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे़ 

पाणीसाठ्यात वाढ होईल गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळ काढण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे शेती सुपिक होवून पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे़ शेतकऱ्यांनी या योजनेतून गाळ काढून आपल्या शेतात टाकावा़ - सुरेश शेजूळ, तहसीलदार,  जिंतूर

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीcollectorतहसीलदार