शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी शहरातून २२ टिप्पर गेले चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:34 PM

शहरातील विविध भागातून गेल्या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीस गेले असून यातील एकाही टिप्परचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील विविध भागातून गेल्या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीस गेले असून यातील एकाही टिप्परचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.परभणी शहरात गेल्या दीड वर्षापासून टिप्पर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. या संदर्भात पोलिसांत तक्रार देऊनही फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीला गेले आहेत.विशेष म्हणजे टिप्पर चोरणारी पर जिल्ह्यतील टोळी शहरात कार्यरत असून या टोळीला स्थानिक काही व्यक्तींची मदत असल्याचे टिप्पर चालकांचे म्हणणे आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर प्रारंभी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जाते. नंतर तक्रार दाखल करण्यासाठी तगादा लावल्यास तक्रार नोंद करुन घेण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. तपास मात्र केला जात नसल्याचा अनुभव टिप्पर चालकांनी व्यक्त केला आहे. सर्वसामान्य टिप्पर चालकांना याबाबतचा अनुभव येत असताना राजकीय नेत्यांच्या धाकांमुळे एक- दोघांचे चोरीला गेलेले टिप्पर सापडल्याचाही अनुभव काहींनी व्यक्त केला.टिप्पर चोरीची नुकतीच एक घटना शहरातील काद्रबाद प्लॉट भागात घडली. शंकर किशनराव नाईकनवरे यांचे एम.एच.१७ ए ६२४७ या क्रमांचे टिप्पर १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सरकारी दवाखान्याजवळील त्यांच्या घर परिसरात उभे केले असता अज्ञात व्यक्तींनी ते चोरुन नेले. याबाबत त्यांनी २० नोव्हेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु, तक्रारीमध्ये टिप्परची किंमत फक्त ५० हजार रुपये दर्शविली गेली. अधिक रक्कम तक्रारीत दर्शविल्यास वरिष्ठ अधिकाºयांकडून तपासासाठी विचारणा होईल म्हणून या वाहनाची कमी रक्कम पोलिसांनी नोंदविली गेली असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. याबाबत वारंवार विनंती करुनही वेगाने तपास केला जात नसल्याचे ते म्हणाले.चोरलेले टिप्पर भंगारात४टिप्पर चोरणारी परजिल्ह्यातील एक टोळीच कार्यरत असून त्यांना स्थानिकांची मदत असल्याचे जाणकारांनी सांगितले. बहुतांश वेळा चोरुन नेलेला टिप्पर तोडून तो भंगारात विकला जातो किंवा परभणीपासून १०० ते २०० कि.मी.अंतरावर असलेल्या भागात तो विक्री करुन खदानीच्या कामासाठी नंबर प्लेट न लावता वापरला जातो, असेही जाणकारांचे मत आहे. टिप्पर चोरीच्या घटना मध्यरात्री होत असताना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास ही बाब कशी काय येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.