शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

परभणी जिल्ह्यात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

जिंतूर तालुक्यातील सोनापूर येथील संजय धर्मा चव्हाण (३५ वर्षे) यांना ८ एकर जमीन आहे. त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ...

जिंतूर तालुक्यातील सोनापूर येथील संजय धर्मा चव्हाण (३५ वर्षे) यांना ८ एकर जमीन आहे. त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. या कर्जास तसेच शेतीतील नापिकीस कंटाळून १९ जुलै रोजी सकाळी ४ ते ७ च्या दरम्यान संजय चव्हाण यांनी शेतातील लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मयत संजय चव्हाण यांचे चुलते नारायण जेमा चव्हाण यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांडा येथे घडली. येथील रुख्मिणबाई चव्हाण यांना २ एकर जमीन आहे. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे ८७ हजार रुपयांचे कर्ज आहे. मागील दीड वर्षापासून शेतीतील उत्पन्न निघाले नाही, म्हणून रुख्मिणबाई चव्हाण यांचा मुलगा परमेश्वर चव्हाण (२१ वर्षे) हा सतत चिंतेत असायचा. याच विवंचनेतून तसेच शेतातील नापिकीस कंटाळून परमेश्वर चव्हाण याने १८ जुलै रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घरातील पत्र्याखालील आडूला विद्युत वायरने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत बळीराम चव्हाण यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून १९ जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.