शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

जिल्ह्यात १ हजार ३७ रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:13 AM

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरोग्य विभागाला बुधवारी २ हजार ७६७ नागरिकांचे अहवाल प्राप्त ...

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरोग्य विभागाला बुधवारी २ हजार ७६७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २००५ अहवालांमध्ये ७७० आणि रॅपिड टेस्टच्या ७६२ अहवालांमध्ये २६७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्रही जिल्ह्यात जोरात सुरू आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ तर खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या १८ रुग्णांमध्ये १० महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण ३४ हजार १७० रुग्णसंख्या नोंद झाली असून त्यापैकी २६ हजार २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनाने ८५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार ९१ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालय २१८, आयटीआय हॉस्पिटल- १५५, जिल्हा परिषदेचे कोविड हॉस्पिटल- २६५, अक्षदा मंगल कार्यालय- १५५, रेणुका कोविड हॉस्पिटल- १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५ हजार ५६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.