शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप वर्तन असभ्य आहे का?- या 8 गोष्टी तपासून पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:56 PM

व्हॉट्सअ‍ॅप तर अनेकजण वापरतात, पण ते सभ्यपणे कसं वापरावं, हे माहिती आहे का?

ठळक मुद्देग्रुप्सवर आपण कसे व्यक्त होतो, कसे वागतो यावरुनही आपली बरीच परीक्षा केली जाते.

निशांत महाजन

अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सचे सेटिंग्ज गेल्या आठवडय़ात बदलले.अ‍ॅडमिन ओन्ली असं सेटिंग झाल्यानं बहुतांश ग्रुप्स एकदम मुकेच झाले. कुणीच काही टुकटुकत नसल्याने आणि आला फॉरवर्ड धाड पुढे कार्यक्रम बंद झाल्यानं व्हॉट्सअ‍ॅपवर शांतता पसरली आणि अनेकांच्या पहिल्यांदाच लक्षात आलं की ही शांतता चांगली आहे. आपण रोज अकारण, तासन्तास चर्चेत वेळ वाया घालवतो. सारखं सारखं फोन उचलून व्हॉट्सअ‍ॅप पाहतो, कोण ऑनलाइन आहे, कुणाचं स्टेटस काय, कुणी डीपी बदलला, कुणी फिल्टर बदलला या सार्‍याची आपल्याला चोख माहिती असते आणि त्याचा विचार करण्यातही बराच वेळ वाया जाताना दिसतो. या सार्‍यात आपण चुकून कधी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप वर्तनाचा विचारही करत नाही. आपल्या फोनची बॅटरी व्हॉट्सअ‍ॅप सतत वापरल्यानं जशी पटकन उतरते तशी आपल्या विचारांची बॅटरीही काही आपल्या या वर्तनावर प्रकाश पाडत नाही. या अ‍ॅडमिन ओन्ली नियमानं जरा उसंत मिळाली असेल तर आपल्या या व्हॉट्सपीय वर्तनावरही जरा नजर घालू आणि आपल्यासह अनेकजण काय काय चुका करतात हे जरा एकदा तपासून पाहू.आजकाल सगळीकडेच सॉफ्टस्किल्स, सॉफ्टपॉवर, सोशल इम्प्रेशन या शब्दांची चर्चा आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिगत म्हणजे नातेवाइक आणि मित्रमैत्रिणी सोडूनही असलेले अनेक कार्यालयीन कामाचे ग्रुप्सही असतात. त्या ग्रुप्सवर आपण कसे व्यक्त होतो, कसे वागतो यावरुनही आपली बरीच परीक्षा केली जाते.त्यामुळे या काही गोष्टींवर नजर घाला आणि ठरवा आपले व्हॉट्सअ‍ॅप वर्तन सभ्य आहे का?

1. ग्रुप असला कुणीतरी दोघे किंवा तिघे एका विषयावर काहीतरी रंजक , माहितीपूर्ण चर्चा करत आहेत. तर नेमकं त्याचवेळी त्या चर्चेत जाऊन काहीतरी मस्करी करणं, भंपक प्रश्न विचारणं, विषय बदलायचा वारंवार प्रय} करणं किंवा तुम्ही कसे बोअर मारताय हे सांगणं हे काही बरे नाही. अनेकांच्या लक्षातही येत नाही की ते असं काही वागतात.2. ग्रुपमधल्या चर्चेत कुणी तुम्हाला काही विचारलं तर उत्तर द्या त्यांच्याकडे लक्ष द्या. तसं न करणं म्हणजे आपण प्रत्यक्ष आयुष्यात कुणीतरी आपल्याला काही विचारत असताना स्वतर्‍च बडबडत राहणं किंवा निघून जाणं असं होय. त्यामुळे निदान त्या व्यक्तीला ‘अ‍ॅकनॉलेज’ तरी करा.3. तुम्ही ग्रुप कसा सोडता यावरही बरंच काही सांगता येऊ शकतं, ते ही तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी. अनेकजण भांडण झाला, राग आला तरी ग्रुप सोडतात. काहीजण सगळा संताप व्यक्त करतात. काहीजण काहीही न बोलता सरळ लेफ्ट होतात. हे काही योग्य नाही. आपण एरव्हीही निरोप सन्मानानं घेतो, देतो. त्यामुळे ग्रुप सोडताना सभ्यपणे कारण सांगावं, रजा मागावी आणि मग ग्रुप सोडावा. तसं न करणं म्हणजे असभ्यच नव्हे तर उद्धट मानलं जातं.4. ग्रुपमध्ये विषय काहीही असो, व्यक्तिगत की राजकारण, खेळ की सिनेमा किंवा नुस्तं फॉरवर्ड तुम्ही प्रत्येक गोष्टीवर वाद घालता का? भांडायलाच लागता का? हमरीतुमरीवर येता का? माझाच मुद्दा खरा असा तुमचा सूर असतो का, तपासा.5. अनेकजण कायम वाद घालतात. त्यांना कुणाचीच मतं, म्हणणं मान्य नसतं. ते मान्य नसणंही ठीक मात्र अगदी समोरच्याला शिव्या घालणं, जाहीर अपमान करणं इथवर काहीजण जातात. आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शनच त्यामुळे होतं.6. ग्रुपमधले सगळेच लोक काही आपल्याला आवडत नाही. पण जे आवडत नाहीत त्यांना काही लोक सतत येताजाता टोमणे मारतात. डिवचून बोलतात. हे वागणं योग्य नाहीच.7. सतत इमोजींचा वापर, अतिरेक आणि वाट्टेल ते इमोजी टाकणं हे ही अशिष्ट मानलं जातं.8. सतत फॉरवर्ड पीजे पाठवणारे, सतत प्रत्येक गोष्टीवर हसणारे, काहीही झालं तरी मत मांडणारेही अनेकजण असतात. ते स्वतर्‍ची शोभा करुन घेतात. आणि मग त्यांच्या या वागण्याचे प्रत्यक्ष जगातही अनेकजण तिखटमीठ लावून वर्णन करतात.