शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जे करताय, ते का करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:58 IST

आपण एखादी गोष्ट करतो; पण ती का करतो, याचं उत्तर आपल्याकडे हवं. नाही तर ती कशी करतो याचे अर्थच बदलतात. म्हणून विश्लेषण करत बसण्यापूर्वी जरा संश्लेषण करा. मग बघा काय होतं.

ठळक मुद्दे‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.

- डॉ. भूषण केळकर

सॉफ्ट स्किल्समध्ये ‘विचारांची स्पष्टता’ ही आत्यंतिक महत्त्वाची आहे. आपण एखादी गोष्ट ‘कशी’ करतो  हे जसं महत्त्वाचं तसं ती गोष्ट ‘का’ करतो हेही महत्त्वाचं. त्या का चे उत्तर निर्‍संदिग्धपणे माहिती असणं म्हणजे विचारांची स्पष्टता असणं.म्हणजेच हेतू जर माहिती असेल तर बहुतांश वेळा कृतीमध्येसुद्धा स्पष्टता येते.हा हेतू माहिती करून घेणं म्हणजे sunthesis त्याला मराठीत संश्लेषण म्हणतात. विश्लेषण म्हणजे अ‍ॅनालिसिस हा शब्द आपण सहज वापरतो. त्यासोबत संश्लेषण करता येणं हे सॉफ्ट स्किल.तुम्हाला मी काही साधी उदाहरणं देतो म्हणजे हे संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल.कसाई धारदार शस्त्रानं पोट फाडतो आणि निष्णात शल्यविशारदही तेच करतो; पण हेतू पूर्ण वेगळे! म्हणजे का या एका गोष्टीनं कृतीचा हेतू बदलला.अजून एक उदाहरण. का नंतर कसं केलं याचं.घरी पाहुणे आलेले असताना मला बायकोने ‘पटकन पोहे घेऊन ये’ असं सांगितलं आणि मी चिवडय़ाचे पातळ पोहे घेऊन आलो! पुढे, पाहुणे गेल्यानंतर आमच्यात जो प्रेमळ संवाद घडला त्याचं सविस्तर वर्णन देण्याची ही जागा नव्हे, नाही का? तर करिअर घडवतानासुद्धा आपण एखादी पदवी/ पदविका ‘का’ करतो आहोत याचं उत्तर आपण नीट जाणलेलं असणं महत्त्वाचं. त्यानं तुम्हाला खूप फायदे होतील.जॉबच्या किंवा शिष्यवृत्तीसाठीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला यूपीएससी परीक्षा का द्यायची होती’ किंवा तुम्ही ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग का निवडलंत?’ किंवा तुम्हाला आमच्याच कंपनीत/ याच जॉब रोलमध्ये नोकरी का करायची आहे?आता या सगळ्या आणि या प्रकारच्या का प्रश्नांना देवाची करणी अन् नारळात पाणी टाइपचे उत्तर देणं धोक्याचं आहे हे तुम्ही ओळखलं असेल!काही वर्षापूर्वी मला धक्का बसला होता. तृतीय वर्ष बी.कॉम.च्या मुलानं मला फोन केला होता. हे विचारायला की आता तीन महिन्यात मी ग्रॅज्युएट होणार तर मी आता नोकरी करू, ती कशी शोधू की एमसीएम करू?मी जेव्हा त्याला विचारलं, की तू जेव्हा तीन वर्षापूर्वी बी.कॉम. सुरु केलंसं तेव्हा तुझ्या मनात काय होतं? आपण बी.कॉम. करून कुठे नोकरी करणार? तर तो म्हणाला मी बी.कॉम. मित्र करत होते म्हणून केलं, फारसा विचार नाही केला! आजकाल मला असे धक्के बसणे कमी झालं आहे. याचं कारण हे नाही की मला अशी मुलं-मुली भेटत नाहीत, तर कारण हे आहे की इतकी मुलं-मुली भेटली आहेत की मन निर्ढावलंय!सिमॉन सिनेक नावाच्या लेखकाचं एक पुस्तक खूप भावलं. ते तुम्हाला जाता जाता सांगून ठेवतो. त्याचं नाव आहे ‘स्टार्ट विथ व्हाय’हेतू समजला तर निर्णयक्षमता वाढते यात शंकाच नाही. म्हणजेच ‘का’ समजलं तर ‘काय’ आणि ‘कसं’ हे सहजसाध्य असेल.मी जेव्हा जेव्हा विद्याथ्र्याबरोबर संवाद साधतो तेव्हा तेव्हा हा विचार करतो की आज मी जे काही त्यांना सांगणार आहे ते ‘का’ सांगणं महत्त्वाचं आहे.  ‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. आजकालची पिढी ते सहज शोधूही शकते. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.नुसत्या माहितीपेक्षा ‘का’चा संदर्भ वापरून करतात ते संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे येतंय ना लक्षात?बघा म्हणजेरेड लेबल असं म्हटलं कुणी.तर ते कोण, का, कसं, कधी म्हटलंय यावरून तुम्ही अर्थ काढता ना? मग कृती करता.कधी चहा आणता आणि कधी.कळलं ना? का किती महत्त्वाचं ते.

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)